शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात शाश्वत पाण्याने वाढले ऊस क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:09 IST

बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

ठळक मुद्दे२० हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी तयारपाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक

परभणी : सातत्याने अवर्षणाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणीस्त्रोत उपलब्ध झाल्याने पारंपरिक पिके घेण्याऐवजी आता बागायती पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला असून, यावर्षी गाळपासाठी येणारे अंतरिम उसाचे क्षेत्र ७ हजार हेक्टरने वाढले आहे.

गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांच्या वास्तव्याने जिल्ह्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नदी काठचा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र सतत अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्याने नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला आणि बागायती पिकांऐवजी कमी कालावधीत येणाऱ्या आणि जिरायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून सोयाबीन, कापूस या पिकांचीच अधिक प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र आता हळूहळू हे चित्र बदलत आहेत.

यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके बाधित झाली. त्याचबरोबर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून, भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. एकंदर जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच पाणीसाठ्याच्या भरवश्यावर आता बागायती पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.

जिल्ह्यातील ऊस क्षेत्राच्या अहवालावरुन ही बाब आता स्पष्ट होत आहे. २०१८-१९ च्या हंगामात जिल्ह्यात १३ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. ती आता यावर्षी २० हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ उपलब्ध पाण्यामुळे ऊस लागवडीचे ७ हजार ६९ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ अपेक्षित आहे. पुढील वर्षात हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होणार आहे.

पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिकजिल्ह्यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड झाली आहे. या तालुक्यातून गोदावरी नदी प्रवाहित झाली आहे. त्याचप्रमाणे याच तालुक्यात ढालेगाव, मुदगल, तारुगव्हाण हे तीन बंधारे आहेत. जायकवाडी प्रकल्पाचा कालवाही तालुक्यातून प्रवाहित झालेला आहे. याचा परिणाम ऊस लागवड वाढीत झाला. तालुक्यातील ८ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र अधिक आहे. जिंतूर तालुक्यात मात्र उसाचे क्षेत्र अत्यल्प राहिले असून, या तालुक्यात सर्वात कमी केवळ ८५ हेक्टर वरील ऊस क्षेत्र गाळपासाठी अंतरिम क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने