शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात शाश्वत पाण्याने वाढले ऊस क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:09 IST

बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

ठळक मुद्दे२० हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी तयारपाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक

परभणी : सातत्याने अवर्षणाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणीस्त्रोत उपलब्ध झाल्याने पारंपरिक पिके घेण्याऐवजी आता बागायती पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला असून, यावर्षी गाळपासाठी येणारे अंतरिम उसाचे क्षेत्र ७ हजार हेक्टरने वाढले आहे.

गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांच्या वास्तव्याने जिल्ह्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नदी काठचा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र सतत अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्याने नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला आणि बागायती पिकांऐवजी कमी कालावधीत येणाऱ्या आणि जिरायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून सोयाबीन, कापूस या पिकांचीच अधिक प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र आता हळूहळू हे चित्र बदलत आहेत.

यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके बाधित झाली. त्याचबरोबर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून, भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. एकंदर जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच पाणीसाठ्याच्या भरवश्यावर आता बागायती पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.

जिल्ह्यातील ऊस क्षेत्राच्या अहवालावरुन ही बाब आता स्पष्ट होत आहे. २०१८-१९ च्या हंगामात जिल्ह्यात १३ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. ती आता यावर्षी २० हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ उपलब्ध पाण्यामुळे ऊस लागवडीचे ७ हजार ६९ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ अपेक्षित आहे. पुढील वर्षात हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होणार आहे.

पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिकजिल्ह्यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड झाली आहे. या तालुक्यातून गोदावरी नदी प्रवाहित झाली आहे. त्याचप्रमाणे याच तालुक्यात ढालेगाव, मुदगल, तारुगव्हाण हे तीन बंधारे आहेत. जायकवाडी प्रकल्पाचा कालवाही तालुक्यातून प्रवाहित झालेला आहे. याचा परिणाम ऊस लागवड वाढीत झाला. तालुक्यातील ८ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र अधिक आहे. जिंतूर तालुक्यात मात्र उसाचे क्षेत्र अत्यल्प राहिले असून, या तालुक्यात सर्वात कमी केवळ ८५ हेक्टर वरील ऊस क्षेत्र गाळपासाठी अंतरिम क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने