शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

ऊस उत्पादकांचा तीन तास रास्ता रोको; दराचा निर्णय झाला अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल

By मारोती जुंबडे | Updated: January 17, 2024 19:20 IST

राजू शेट्टी यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व; कारखानदारांकडून २७०० रुपये भाव देण्याचे आश्वासन

परभणी: ऊसाला सरसकट प्रतिटन २७०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. २ तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्ह्यातील सात साखर कारखानदारांनी हा भाव देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा रास्ता रोको ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आला.

जिल्ह्यातील ऊसाला २७०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा, या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा धसका घेऊन जिल्ह्यातील सात पैकी पाच कारखान्यांनी हा भाव देऊ असे जाहीर केले. परंतु, जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे प्रशासन हे भाव देण्यास तयार नव्हते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे रास्ता रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. या आंदोलनादरम्यान त्या दोन साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बराच वेळ चाललेल्या चर्चा दरम्यान ऊसाला प्रतिटन २७०० रुपये भाव देण्याचे हमी यावेळी देण्यात आली. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आदोंलनात किशोर ढगे, दिपक लिपणे, रामप्रसाद गमे,गजानन तुरे, रामराजे महाडीक, प्रसाद गरुड, मुंजा लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले, रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयुर वाघमारे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलालजिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन २७०० भाव देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन तास चाललेल्या आंदोलनाला यश आले. त्यानंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनस्थळी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

वाढीव ६४ कोटी रुपये मिळणारजिल्ह्यातील ऊसाला सात पैकी दोन कारखानदारांकडून २४०० ते २५०० प्रतिटन भाव देण्यात येत होता. त्यामुळे सातही कारखान्यांनी उसाला २७०० रुपये प्रति टनचा भाव द्यावा, यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आल्यानंतर जिल्ह्यात यावर्षी जवळपास ३२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. या पोटी सुधारित भावाने जवळपास ६४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रSugar factoryसाखर कारखाने