शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ऊस उत्पादकांचा तीन तास रास्ता रोको; दराचा निर्णय झाला अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल

By मारोती जुंबडे | Updated: January 17, 2024 19:20 IST

राजू शेट्टी यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व; कारखानदारांकडून २७०० रुपये भाव देण्याचे आश्वासन

परभणी: ऊसाला सरसकट प्रतिटन २७०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. २ तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्ह्यातील सात साखर कारखानदारांनी हा भाव देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा रास्ता रोको ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आला.

जिल्ह्यातील ऊसाला २७०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा, या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा धसका घेऊन जिल्ह्यातील सात पैकी पाच कारखान्यांनी हा भाव देऊ असे जाहीर केले. परंतु, जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे प्रशासन हे भाव देण्यास तयार नव्हते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे रास्ता रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. या आंदोलनादरम्यान त्या दोन साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बराच वेळ चाललेल्या चर्चा दरम्यान ऊसाला प्रतिटन २७०० रुपये भाव देण्याचे हमी यावेळी देण्यात आली. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आदोंलनात किशोर ढगे, दिपक लिपणे, रामप्रसाद गमे,गजानन तुरे, रामराजे महाडीक, प्रसाद गरुड, मुंजा लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले, रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयुर वाघमारे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलालजिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन २७०० भाव देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन तास चाललेल्या आंदोलनाला यश आले. त्यानंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनस्थळी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

वाढीव ६४ कोटी रुपये मिळणारजिल्ह्यातील ऊसाला सात पैकी दोन कारखानदारांकडून २४०० ते २५०० प्रतिटन भाव देण्यात येत होता. त्यामुळे सातही कारखान्यांनी उसाला २७०० रुपये प्रति टनचा भाव द्यावा, यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आल्यानंतर जिल्ह्यात यावर्षी जवळपास ३२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. या पोटी सुधारित भावाने जवळपास ६४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रSugar factoryसाखर कारखाने