शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

कंठेश्वर बंधाऱ्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष; वेळोवेळी सुधारित किंमती वाढूनही होईना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:48 IST

कंठेश्वर निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाऱ्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे़

पूर्णा (परभणी ) : तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाऱ्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे़ याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना निवेदन देऊन, आंदोलन करूनही या कामास गती मिळाली नाही़ अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी हा प्रश्न लोकशाही दिनात मांडला़ त्यानंतर तालुका, जिल्हाधिकारी यांच्या  निर्णयानंतर आता या प्रश्नी विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात अर्ज करण्यात आला.

तालुक्यातील कंठेश्वर, महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम रखडले आहे़ पूर्णा नदीवर २००९ साली कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली़ या बंधाऱ्याच्या कामासाठी २००५-०६ मध्ये २ कोटी १० लाख ६३ हजार ९२३ रुपये या सुधारित किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली़ राज्यस्तरीय सल्लागार समितीने १५ डिसेंबर २०१५ रोजी ६६ व्या बैठकीत सुधारित प्रशासकीय अहवाल अंतीम करून महामंडळास सादर केला़ त्यानंतर बांधकामाची सुधारित किंमत ३ कोटी ५५ लाख ७४ हजार ८०० पर्यंत गेली आहे़ या बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाकडून वेळोवेळी सुधारित किंमत वाढूनही हे काम रखडले आहे़

बंधारा पूर्ण झाल्यास पूर्णा तालुक्यातील ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ यामध्ये निळा येथील ४०० हेक्टर, कळगाव १०० हेक्टर, महागाव १०० हेक्टर, कंठेश्वर १०० हेक्टर, आजदापूर १०० हेक्टर तर कानखेड या परिसरातील काही भाग सिंचनाखाली येणार आहे़ तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे़ कोल्हापुरी बंधाऱ्याच्या अपूर्ण कामाबाबत परिसरातील नागरिकांचा मागील चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे़ मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता़ २७ मार्च रोजी कार्यकारी अभियंता यांनी या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून, लोकशाही दिनानंतर २४ मीटर स्लॅबचे काम झाल्याची लेखी माहिती जिल्हाधिकारी यांना कळविली होती़ परंतु, त्यानंतर कामाची  गती पूर्णपणे थांबली़ आता बंधाऱ्याचे हे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात दाखल करण्यात आले असून, २ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्यात आला आहे़ अर्जावर संजय  गंगाधर कदम, दिगंबर सूर्यवंशी, लक्ष्मण वैद्य, पांडूरंग कदम, ओंकार वसमतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ 

निधी मंजूर काम ठप्पपूर्णा तालुक्यातील कंठेश्वर-निळा या परिसरातील नदीपात्रातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला़ परंतु, निधी मंजूर होवूनही कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे हे काम अनेक वर्षांपासून पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे याकडे विभागीय आयुक्तांनी लक्ष देऊन काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी