शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:26 IST

रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे.परभणी शहरासह तालुक्यात दुपारी एक वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. काही वेळातच जोरदार पावसालाही सुरुवात झाली. एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत शहर परिसरात हा पाऊस बरसला. पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. परभणी शहरासह टाकळी कुंभकर्ण, पिंगळी, वांगी, असोला या भागातही पावसाने हजेरी लावली.जिंतूर तालुक्यातील बामणी व परिसरात रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच येलदरी परिसरातही पावसाने हजेरी लावली. एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मानवत तालुक्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने मोठा ताण दिला होता. आता खरीपातील पिके काढणीला आले आहेत आणि त्यातच पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.अनेक भागात सोयाबीन कापून ठेवले आहे. तर काही भागात सोयबीनची काढणी सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील शेतकरी गंगाधर चव्हाण यांनी सोयाबीनची हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी केली होती. रविवारी झालेल्या पावसाने हे सोयाबीन भिजले आहे. अशीच परिस्थिती या भागातील इतर शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.सेलूत जोरदार पाऊस४ सेलू व परिसरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सलग दुसºया दिवशी दमदार पाऊस झाल्याने परिसरातील पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान रविवारी वादळी वाºयासह पाऊस झाल्याने तालुक्यातील केमापूर परिसरातील कापसाची झाडे वाकून गेली आहेत.येलदरी प्रकल्प : ९.१७ टक्के पाणी४जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या वरील बाजुस असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास या प्रकल्पाचे ५ दरवाजे १० सें.मी.ने वर उचलण्यात आले असून खडकपूर्णा प्रकल्पातून २ हजार ४४० क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे, अशी माहिती खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली.४खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.४६ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता येलदरी प्रकल्पात ७४.२२८ दलघमी जीवंत पाणीसाठा जमा झाला होता. या पाणीसाठ्याची टक्केवारी ९.१७ टक्के एवढी आहे.४मागील २४ तासांत येलदरी प्रकल्पामध्ये ३.४५ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत ११४.५६ दलघमी पाण्याची आवक प्रकल्पात झाली. १ जूनपासून आतापर्यंत प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात ८०९ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस