शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:26 IST

रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे.परभणी शहरासह तालुक्यात दुपारी एक वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. काही वेळातच जोरदार पावसालाही सुरुवात झाली. एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत शहर परिसरात हा पाऊस बरसला. पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. परभणी शहरासह टाकळी कुंभकर्ण, पिंगळी, वांगी, असोला या भागातही पावसाने हजेरी लावली.जिंतूर तालुक्यातील बामणी व परिसरात रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच येलदरी परिसरातही पावसाने हजेरी लावली. एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मानवत तालुक्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने मोठा ताण दिला होता. आता खरीपातील पिके काढणीला आले आहेत आणि त्यातच पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.अनेक भागात सोयाबीन कापून ठेवले आहे. तर काही भागात सोयबीनची काढणी सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील शेतकरी गंगाधर चव्हाण यांनी सोयाबीनची हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी केली होती. रविवारी झालेल्या पावसाने हे सोयाबीन भिजले आहे. अशीच परिस्थिती या भागातील इतर शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.सेलूत जोरदार पाऊस४ सेलू व परिसरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सलग दुसºया दिवशी दमदार पाऊस झाल्याने परिसरातील पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान रविवारी वादळी वाºयासह पाऊस झाल्याने तालुक्यातील केमापूर परिसरातील कापसाची झाडे वाकून गेली आहेत.येलदरी प्रकल्प : ९.१७ टक्के पाणी४जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या वरील बाजुस असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास या प्रकल्पाचे ५ दरवाजे १० सें.मी.ने वर उचलण्यात आले असून खडकपूर्णा प्रकल्पातून २ हजार ४४० क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे, अशी माहिती खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली.४खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.४६ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता येलदरी प्रकल्पात ७४.२२८ दलघमी जीवंत पाणीसाठा जमा झाला होता. या पाणीसाठ्याची टक्केवारी ९.१७ टक्के एवढी आहे.४मागील २४ तासांत येलदरी प्रकल्पामध्ये ३.४५ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत ११४.५६ दलघमी पाण्याची आवक प्रकल्पात झाली. १ जूनपासून आतापर्यंत प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात ८०९ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस