शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

योग्य आहाराबाबत अजूनही अनास्था, ५० टक्के नागरिकांना ॲनिमियाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 19:45 IST

मॉर्निंग वॉक, योगा करुन शरीर सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आहाराच्या बाबतीत अजूनही जागरुकता झालेली नाही.

परभणी : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आहारातील अनियमियता आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे ॲनिमियाची समस्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार सर्वच वयोगटातील ५० टक्के नागरिकांमध्ये ॲनिमियाचा त्रास असतो. त्यामुळे शरीर सुदृढतेबरोबरच पोषक आहारावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अलीकडच्या काळात नागरिक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. मॉर्निंग वॉक, योगा करुन शरीर सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आहाराच्या बाबतीत अजूनही जागरुकता झालेली नाही. त्यात अनियमित आहार घेणे, जंक फूडचा वापर यामुळे शारीरिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण अधिक आहे. २६ नोव्हेंबर रोजी जगभरात ॲनिमिया दिन साजरा केला जातो. तर हा ॲनिमिया नेमका काय आहे? तो होऊ नये यासाठी काय केले पाहिजे? या विषयी येथील वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. संदीप कार्ले यांनी विस्ताराने सांगितले.

शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी तसेच शरीराचे दैनंदिन कार्य योग्य प्रमाणात चालण्यासाठी हिमोग्लोबिनचे (लाल रक्तघटक) प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे; परंतु भारतामध्ये लहान मुले, युवक तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता आदी सर्वच वयोगटात ५० ते ६० टक्के व्यक्तींमध्ये शरीरात रक्ताचे प्रमाण कमी (ॲनेमिया) असण्याची समस्या आढळते. गर्भवती स्त्रियांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही. शरीरामध्ये लोह, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक ॲसिडची कमतरता व आहारातील इतर त्रुटी हे ॲनिमियाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने संतुलित आहार घेणे व त्याचबरोबर जाणीवपूर्वक अंगामध्ये रक्ताचे प्रमाण वाढवणारे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे.

आहारात काय असाव?शाकाहारी अन्नामध्ये लोह नॉनहिम प्रकारामध्ये उपलब्ध असते तर मांसाहारी अन्नामध्ये हिम प्रकारचे लोह असते. आपल्या आतड्यांना हिम प्रकारचे लोह शोषून घेणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे शाकाहारी आहारात फळे व हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन या घटकांमुळे आतड्यांना नॉन हिम प्रकारचे लोह शोषून घेण्यास मदत होते. विशेषत: शाकाहारी व्यक्तींच्या आहारात योग्य प्रमाणात फळे, भाज्या, डाळी, कडधान्य यांचे मिश्रण असावे.

ॲनिमियाचे दुष्परिणामसतत थकवा जाणवतो, मुलांची वाढ कमी होते. कुपोषण होते. मुले हट्टी व चिडचिडी होतात. मेंदूच्या वाढीवर परिणाम होतो. प्रतिकारक्षमता कमी होते. सतत आजारी पडतात. शेवटी वजन, उंची वाढीवर विपरीत परिणाम होतो.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक असणे ही उत्तम आरोग्याची व बौद्धिक विकासाची गुरुकिल्ली आहे. मुलांना पौष्टिक आहार खाऊ घालणे हे केवळ आईचे काम नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे.- डॉ. संदीप कार्ले

टॅग्स :Healthआरोग्यparabhaniपरभणी