शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:44 IST

पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.उन्हाळ्यात प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु, त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली. आतापर्यंत केवळ दोन वेळा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे पेरणीयोग्य वातावरण तयार झाले असले तरी प्रकल्पांमधील जलसाठ्याला मात्र फायदा झाला नाही. त्यामुळे प्रकल्प पाण्याने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीला डिग्रस बंधाऱ्यात सर्वाधिक ३९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीत झरी प्रकल्पात ६१ टक्के पाणी असल्याची नोंद घेण्यात आली. मात्र या प्रकल्पामध्ये जायकवाडी प्रकल्पाचे पाणी साठविले आहे. त्यामुळे पावसामुळे अजूनही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही.गोदावरी नदीवर एकूण ४ बंधारे बांधले आहेत. त्यापैकी पाथरी तालुक्यातील मुद्गलच्या बंधाºयात ११.६३ टक्के, ढालेगाव बंधाºयात १२.२४ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात १०.७५ टक्के पाणीसाठा झाला आहे.प्रकल्पामंधील पाण्याची पातळी वाढली नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील दोन वर्षापासून प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने जिल्हावासियांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी असल्याने ओरड झाली नाही. परंतु, प्रकल्पांची सध्याची स्थिती लक्षात घेता आगामी काळात मूबलक पाऊस झाला नाही तर पुढील उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.१६७ मि.मी. पाऊस१ जून ते २९ जून या काळात परभणी जिल्ह्यात १६७.४८ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत २१ टक्के आणि जून महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३३ टक्के पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार हा पाऊस समाधानकारक असला तरी प्रत्यक्षात प्रकल्पाच्या पाणीसाठ्यासाठी या पावसाचा थोडाही लाभ झाला नाही. त्यामुळे जिल्हावासियांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.ाम्न दुधना प्रकल्पात १४ टक्के पाणीयावर्षीच्या उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक गावांची भिस्त निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर होती. उन्हाळ्यामध्ये या प्रकल्पामध्ये ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र पावसाळ्यात या प्रकल्पात केवळ १४.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पाची जीवंत पाणीसाठ्याची क्षमता २४२ दलघमी एवढी असून प्रत्यक्षात ३४ दलघमी पाणी प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी जून महिन्यामध्ये प्रकल्पामध्ये ४०.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पानेही तळ गाठल्याने चिंता वाढल्या आहेत.‘येलदरी’त वाढेना पाणीपरभणी शहरासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शहरांची तहान भागविणारा येलदरी प्रकल्प यावर्षीच्या उन्हाळ्यात मृतसाठ्यात गेला. त्यामुळे अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागली होती. या प्रकल्पात सध्याही शून्य टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण