शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:44 IST

पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.उन्हाळ्यात प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु, त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली. आतापर्यंत केवळ दोन वेळा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे पेरणीयोग्य वातावरण तयार झाले असले तरी प्रकल्पांमधील जलसाठ्याला मात्र फायदा झाला नाही. त्यामुळे प्रकल्प पाण्याने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीला डिग्रस बंधाऱ्यात सर्वाधिक ३९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीत झरी प्रकल्पात ६१ टक्के पाणी असल्याची नोंद घेण्यात आली. मात्र या प्रकल्पामध्ये जायकवाडी प्रकल्पाचे पाणी साठविले आहे. त्यामुळे पावसामुळे अजूनही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही.गोदावरी नदीवर एकूण ४ बंधारे बांधले आहेत. त्यापैकी पाथरी तालुक्यातील मुद्गलच्या बंधाºयात ११.६३ टक्के, ढालेगाव बंधाºयात १२.२४ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात १०.७५ टक्के पाणीसाठा झाला आहे.प्रकल्पामंधील पाण्याची पातळी वाढली नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील दोन वर्षापासून प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने जिल्हावासियांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी असल्याने ओरड झाली नाही. परंतु, प्रकल्पांची सध्याची स्थिती लक्षात घेता आगामी काळात मूबलक पाऊस झाला नाही तर पुढील उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.१६७ मि.मी. पाऊस१ जून ते २९ जून या काळात परभणी जिल्ह्यात १६७.४८ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत २१ टक्के आणि जून महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३३ टक्के पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार हा पाऊस समाधानकारक असला तरी प्रत्यक्षात प्रकल्पाच्या पाणीसाठ्यासाठी या पावसाचा थोडाही लाभ झाला नाही. त्यामुळे जिल्हावासियांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.ाम्न दुधना प्रकल्पात १४ टक्के पाणीयावर्षीच्या उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक गावांची भिस्त निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर होती. उन्हाळ्यामध्ये या प्रकल्पामध्ये ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र पावसाळ्यात या प्रकल्पात केवळ १४.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पाची जीवंत पाणीसाठ्याची क्षमता २४२ दलघमी एवढी असून प्रत्यक्षात ३४ दलघमी पाणी प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी जून महिन्यामध्ये प्रकल्पामध्ये ४०.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पानेही तळ गाठल्याने चिंता वाढल्या आहेत.‘येलदरी’त वाढेना पाणीपरभणी शहरासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शहरांची तहान भागविणारा येलदरी प्रकल्प यावर्षीच्या उन्हाळ्यात मृतसाठ्यात गेला. त्यामुळे अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागली होती. या प्रकल्पात सध्याही शून्य टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण