शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन तक्रारदार वाऱ्यावर; एकालाही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:06 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले  होते़ त्यापैकी ५ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे११ हजार ५०० तक्रारदारांचे पंचनामे पूर्ण ईगल कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी 

परभणी :  निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे दिल्याच्या जिल्ह्यात १२ हजार ५०० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून, त्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पंचनामे कृषी विभागाने  केले आहेत. असे असले तरी अद्याप त्यांना  मोबदला देण्याच्या अनुषंगाने कसलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले  होते़ त्यापैकी ५ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, १ लाख ४४ हजार १६६ हेक्टरवर कापूस तर ३४ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी केल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे़ विश्ोष म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ त्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीनची पिके चांगली बहरली; परंतु, जिल्ह्यातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या़ 

तालुका कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या या तक्रारींच्या अनुषंगाने आतापर्यंत ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या जवळपास १२ हजार हेक्टर जमिनीवरील पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत़ कृषी विभागाने पंचनामे केलेल्यांचा अहवाल बियाणे कंपन्यांना सुपूर्द केला आहे; परंतु, अद्यापपर्यंत एकाही बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतलेला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना उसणवारी व सावकारांचे उंबरवठे झिजवून पैसे मिळवित सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली; परंतु, या कंपन्यांनी  अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयांचीही मदत केलेली नाही़ केवळ कृषी विभागाकडे काही कंपन्यांनी आम्ही शेतकऱ्यांना रोखीने मदत करू, असे पत्र दिले आहे़ मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे तक्रारदार सोयाबीन उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे़ 

ईगल कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईगल या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीविषयी ४ हजार २८५ तक्रारी केल्या आहेत; परंतु या कंपनीने अद्यापपर्यंत कोणतीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही़ शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे़ त्यापाठोपाठ १ हजार ३५० महाबीज, ८१५ ग्रीन गोल्ड, सारस, गोदाफार्म आदी कंपन्यांची बियाणे सदोष असल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी कार्यालयास प्राप्त झाल्या़ या कंपन्यांकडे कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठविला आहे़ मात्र, मदतीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्र