शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन तक्रारदार वाऱ्यावर; एकालाही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:06 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले  होते़ त्यापैकी ५ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे११ हजार ५०० तक्रारदारांचे पंचनामे पूर्ण ईगल कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी 

परभणी :  निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे दिल्याच्या जिल्ह्यात १२ हजार ५०० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून, त्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पंचनामे कृषी विभागाने  केले आहेत. असे असले तरी अद्याप त्यांना  मोबदला देण्याच्या अनुषंगाने कसलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले  होते़ त्यापैकी ५ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, १ लाख ४४ हजार १६६ हेक्टरवर कापूस तर ३४ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी केल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे़ विश्ोष म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ त्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीनची पिके चांगली बहरली; परंतु, जिल्ह्यातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या़ 

तालुका कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या या तक्रारींच्या अनुषंगाने आतापर्यंत ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या जवळपास १२ हजार हेक्टर जमिनीवरील पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत़ कृषी विभागाने पंचनामे केलेल्यांचा अहवाल बियाणे कंपन्यांना सुपूर्द केला आहे; परंतु, अद्यापपर्यंत एकाही बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतलेला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना उसणवारी व सावकारांचे उंबरवठे झिजवून पैसे मिळवित सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली; परंतु, या कंपन्यांनी  अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयांचीही मदत केलेली नाही़ केवळ कृषी विभागाकडे काही कंपन्यांनी आम्ही शेतकऱ्यांना रोखीने मदत करू, असे पत्र दिले आहे़ मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे तक्रारदार सोयाबीन उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे़ 

ईगल कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईगल या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीविषयी ४ हजार २८५ तक्रारी केल्या आहेत; परंतु या कंपनीने अद्यापपर्यंत कोणतीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही़ शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे़ त्यापाठोपाठ १ हजार ३५० महाबीज, ८१५ ग्रीन गोल्ड, सारस, गोदाफार्म आदी कंपन्यांची बियाणे सदोष असल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी कार्यालयास प्राप्त झाल्या़ या कंपन्यांकडे कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठविला आहे़ मात्र, मदतीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्र