शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गोदावरी पट्ट्यात १७ हजार हेक्टरवर ऊस लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:55 IST

पाथरी तालुक्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीपात्रातून बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपाथरी तालुक्यात तीन ते चार वर्षे दुष्काळी स्थिती होती यावर्षी पहिल्यांदाच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

- विठ्ठल भिसे 

पाथरी (परभणी ) : पाथरी तालुक्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीपात्रातून बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. काही वर्षानंतर पहिल्यांदाच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

पाथरी तालुक्यात तीन ते चार वर्षे दुष्काळी स्थिती होती. अत्यंत कमी पाऊस होत असल्याने बागायतीचे क्षेत्र कमी झाले होते. काही वर्षापूर्वी पाथरी तालुक्यातील गोदावरीचा भाग उसाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. दोन खाजगी साखर कारखाने असूनही पाण्याची सुविधा अपुरी पडत असल्याने उसाचे क्षेत्रही घटले होते. यावर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येत आहे. तसेच गोदावरी नदीपात्रावरील बंधाऱ्यामध्येही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. तालुक्यात पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने शेतकरीही आता कोरडवाहू पिके सोडून बागायतीची पिके घेत आहेत.

नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. अनेक वर्षानंतर पाथरी तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. पाथरी येथील रेणुका शुगर व लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स या दोन खाजगी कारखानाक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढले आहे. पाथरी कारखाना कार्यक्षेत्रात ७ हजार ८४० हेक्टर तर लिंबा कारखाना कार्र्यक्षेत्रात ८ हजार ९७६ हेक्टर, अशा एकूण १६ हजार ८१६ हेक्टरवर ऊस लागवड झाल्याची नोंदणी झाली आहे. गतवर्षी पाथरीच्या रेणुका शुगर्सने १ लाख ६० हजार मे. टन तर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सने २ लाख मे.टन उसाचे गाळप केले होते. 

पूर्ण क्षमतेने गाळप होण्याची आवश्यकतापाथरी तालुक्यात यावर्षी प्रथमच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेपेक्षा ३५ टक्के अधिक ही लागवड आहे. परभणी जिल्ह्यात पाथरी येथील रेणुका शुगर्स, लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स, गंगाखेड, पूर्णा, त्रिधारा असे पाच कारखाने आहेत. गतवर्षी जिल्हाबाहेरील ७ ते ८ कारखाने शेतकऱ्यांची मनधरणी करीत ऊस घेऊन जात होते. यावर्षी सगळीकडेच उसाचे क्षेत्र वाढले आहे. बीड जिल्ह्यातही अधिक उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे तेथील कारखाने  ऊस गाळपासाठी नेतील, याची शाश्वती उरली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने वेळेत पूर्ण क्षमतेने गाळप करू शकल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :godavariगोदावरीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी