शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
3
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
4
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
5
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
6
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
7
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
8
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
9
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
10
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
11
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
12
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
13
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
14
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
15
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
16
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
18
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
19
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
20
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:23 IST

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र घटले: पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतो. गत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्यानंतर शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्याच बरोबर बाजारपेठेतही कवडीमोल दराने कापूस विक्री करावा लागला. या उलट सोयाबीनला सरतेशेवटी बाजारपेठेत ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार २७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये सोयाबीनसाठी ८८ हजार ६३०, कापसासाठी २ लाख ९ हजार ४३०, मुगासाठी ५३ हजार ३५०, तुरीसाठी ६१ हजार २३०, उडीदासाठी १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते.गत खरीप हंगामातील कापसाचा कटू अनुभव पाहता यावर्षी सोयाबीनचा पेरा जिल्ह्यामध्ये वाढेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार ७ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये १ लाख ६४ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर दुसरीकडे २ लाख ९ हजार ४३० हेक्टरपैकी केवळ १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात १८५ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे.---दमदार पावसाची गरजयावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस होत आहे. या पावसावरच शेतकरी पेरता झाला आहे. पिकांची अवस्थाही बºयापैकी आहे; परंतु, सध्या जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांमध्ये एखादा चांगला पाऊस झाला तर पिकांना जीवदान मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी