शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:23 IST

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र घटले: पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतो. गत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्यानंतर शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्याच बरोबर बाजारपेठेतही कवडीमोल दराने कापूस विक्री करावा लागला. या उलट सोयाबीनला सरतेशेवटी बाजारपेठेत ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार २७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये सोयाबीनसाठी ८८ हजार ६३०, कापसासाठी २ लाख ९ हजार ४३०, मुगासाठी ५३ हजार ३५०, तुरीसाठी ६१ हजार २३०, उडीदासाठी १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते.गत खरीप हंगामातील कापसाचा कटू अनुभव पाहता यावर्षी सोयाबीनचा पेरा जिल्ह्यामध्ये वाढेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार ७ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये १ लाख ६४ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर दुसरीकडे २ लाख ९ हजार ४३० हेक्टरपैकी केवळ १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात १८५ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे.---दमदार पावसाची गरजयावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस होत आहे. या पावसावरच शेतकरी पेरता झाला आहे. पिकांची अवस्थाही बºयापैकी आहे; परंतु, सध्या जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांमध्ये एखादा चांगला पाऊस झाला तर पिकांना जीवदान मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी