शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:23 IST

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र घटले: पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतो. गत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्यानंतर शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्याच बरोबर बाजारपेठेतही कवडीमोल दराने कापूस विक्री करावा लागला. या उलट सोयाबीनला सरतेशेवटी बाजारपेठेत ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार २७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये सोयाबीनसाठी ८८ हजार ६३०, कापसासाठी २ लाख ९ हजार ४३०, मुगासाठी ५३ हजार ३५०, तुरीसाठी ६१ हजार २३०, उडीदासाठी १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते.गत खरीप हंगामातील कापसाचा कटू अनुभव पाहता यावर्षी सोयाबीनचा पेरा जिल्ह्यामध्ये वाढेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार ७ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये १ लाख ६४ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर दुसरीकडे २ लाख ९ हजार ४३० हेक्टरपैकी केवळ १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात १८५ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे.---दमदार पावसाची गरजयावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस होत आहे. या पावसावरच शेतकरी पेरता झाला आहे. पिकांची अवस्थाही बºयापैकी आहे; परंतु, सध्या जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांमध्ये एखादा चांगला पाऊस झाला तर पिकांना जीवदान मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी