शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:51 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जून अखेरपर्यंत पुरेल एवढ्या ६ लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन केले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे़ पाणीटंचाई बरोबरच चाऱ्याचाही प्रश्न या काळात निर्माण होवू शकतो़ खरीप हंगामामध्ये झालेल्या पेरणीवर काही चारा प्रशासनाकडे उपलब्ध आहे़ तसेच रबी हंगामातही थोड्याफार प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता होणार असून, चारा टंचाई उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे़ येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार ३० आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेला चाऱ्यावर पुढील नियोजन करण्यात आले आहे़

परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८४५ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता झाली आहे़ तसेच ३० आॅक्टोबरपर्यंत २७ हजार २३१ मे़ टन चारा रबी हंगामात झालेल्या पेरणीतून उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे़ याशिवाय वनक्षेत्र, चटई क्षेत्र, कुरण, बांधावरील क्षेत्र, पडिक जमीन या भागातील चाऱ्याचा आढावा घेतला तेव्हा १ लाख ३०० मे़ टन चारा उपलब्ध आहे़ तसेच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मक्याची पेरणी झाली असून, त्यातूनही २० हजार ६४० मे़ टन चारा मिळेल़

महाराष्ट्र शासनाने जिल्हा नियोजन विशेष समितीच्या माध्यमातून राबविलेल्या योजनेतून ३१ हजार ७४३ म़े टन, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १७ हजार ५०० मे़टन चारा उपलब्ध होईल़ त्यामुळे या सर्व घटकांमधून परभणी जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार २९३ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता होवू शकते़ हा चारा जून अखेरपर्यंत पुरू शकतो़ विशेष म्हणजे ३० आॅक्टोबरपर्यंतचा हा अहवाल असून, त्यावेळी रबी हंगामात केवळ ३ टक्के पेरणी झाली होती़ या पेरणीच्या आधारे २७ हजार २३१ मे़ टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते़ सद्यस्थितीला रबी हंगामातील पेरणी १३ टक्क्यांवर पोहचली. रबीतूनही चारा उपलब्ध होणार आहे़ 

दररोज लागतो २५४६ मे़ टन चारापरभणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या पशुधनाची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत मोठ्या जनावरांसाठी दररोज ६ किलो, लहान जनावरांसाठी ३ किलो आणि शेळ्या-मेंढ्यासाठी ०़६ किलो चारा प्रतिदिन लागतो, असे निष्कर्ष काढले आहेत़ या निष्कर्षानुसार परभणी जिल्ह्यात जनावरांसाठी दररोज २५४६ मे़ टन चाऱ्याची आवश्यकता आहे़ तर महिन्याकाठी ७६ लाख ३९३ मे़टन चारा जिल्ह्याला लागतो़

जिल्ह्यात साडेतीन लाख जनावरेपशूसंवर्धन विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये ३ लाख ६२ हजार ७९३ मोठी जनावरे आहेत़ तर ९१ हजार ३१० लहान जनावरे आहेत़ चाऱ्यासाठी पशूसंवर्धन विभाग घटक स्वरुपात जनावरांची नोंदणी करते़ त्यानुसार लहान जनावरांमध्ये दोन घटक गृहित धरले जातात़ त्यामुळे लहान जनावरांची घटक संख्या ४५ हजार ६५५ एवढी असून, शेळ्या-मेंढ्या १ लाख ५९ हजार ५५९ एवढ्या असून, त्यांची घटक संख्या १५ हजार ९५६ एवढी आहे़ जिल्ह्यामध्ये ४ लाख ४२ हजार ४०४ पशूधन घटक उपलब्ध असून, या घटकांनुसार चाऱ्याचे नियोजन करण्यात येते़ 

चाऱ्यासाठी २५ लाखांची मागणीभविष्यात जिल्ह्यामध्ये चारा कमी पडू नये, यासाठी चारा उत्पादनाचाही उपक्रम राबविण्यात येणार असून, चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनामार्फत बियाणांचे वाटप करण्यासाठी पूनर्विनियोजन अंतर्गत २५ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ 

१ कोटी ८८ लाखांची नोंदविली मागणीजिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यामध्ये चाऱ्याची टंचाई वाढू शकते़ त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे होईल़ पशू संवर्धन विभागामार्फत गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे़ भविष्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तर चारा छावण्या उभाराव्या लागतील़ त्यासाठी शासनाकडे १ कोटी ८८ लाख रुपयांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ़ संजीव खोडवे यांनी दिली़ 

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी