शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:51 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जून अखेरपर्यंत पुरेल एवढ्या ६ लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन केले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे़ पाणीटंचाई बरोबरच चाऱ्याचाही प्रश्न या काळात निर्माण होवू शकतो़ खरीप हंगामामध्ये झालेल्या पेरणीवर काही चारा प्रशासनाकडे उपलब्ध आहे़ तसेच रबी हंगामातही थोड्याफार प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता होणार असून, चारा टंचाई उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे़ येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार ३० आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेला चाऱ्यावर पुढील नियोजन करण्यात आले आहे़

परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८४५ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता झाली आहे़ तसेच ३० आॅक्टोबरपर्यंत २७ हजार २३१ मे़ टन चारा रबी हंगामात झालेल्या पेरणीतून उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे़ याशिवाय वनक्षेत्र, चटई क्षेत्र, कुरण, बांधावरील क्षेत्र, पडिक जमीन या भागातील चाऱ्याचा आढावा घेतला तेव्हा १ लाख ३०० मे़ टन चारा उपलब्ध आहे़ तसेच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मक्याची पेरणी झाली असून, त्यातूनही २० हजार ६४० मे़ टन चारा मिळेल़

महाराष्ट्र शासनाने जिल्हा नियोजन विशेष समितीच्या माध्यमातून राबविलेल्या योजनेतून ३१ हजार ७४३ म़े टन, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १७ हजार ५०० मे़टन चारा उपलब्ध होईल़ त्यामुळे या सर्व घटकांमधून परभणी जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार २९३ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता होवू शकते़ हा चारा जून अखेरपर्यंत पुरू शकतो़ विशेष म्हणजे ३० आॅक्टोबरपर्यंतचा हा अहवाल असून, त्यावेळी रबी हंगामात केवळ ३ टक्के पेरणी झाली होती़ या पेरणीच्या आधारे २७ हजार २३१ मे़ टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते़ सद्यस्थितीला रबी हंगामातील पेरणी १३ टक्क्यांवर पोहचली. रबीतूनही चारा उपलब्ध होणार आहे़ 

दररोज लागतो २५४६ मे़ टन चारापरभणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या पशुधनाची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत मोठ्या जनावरांसाठी दररोज ६ किलो, लहान जनावरांसाठी ३ किलो आणि शेळ्या-मेंढ्यासाठी ०़६ किलो चारा प्रतिदिन लागतो, असे निष्कर्ष काढले आहेत़ या निष्कर्षानुसार परभणी जिल्ह्यात जनावरांसाठी दररोज २५४६ मे़ टन चाऱ्याची आवश्यकता आहे़ तर महिन्याकाठी ७६ लाख ३९३ मे़टन चारा जिल्ह्याला लागतो़

जिल्ह्यात साडेतीन लाख जनावरेपशूसंवर्धन विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये ३ लाख ६२ हजार ७९३ मोठी जनावरे आहेत़ तर ९१ हजार ३१० लहान जनावरे आहेत़ चाऱ्यासाठी पशूसंवर्धन विभाग घटक स्वरुपात जनावरांची नोंदणी करते़ त्यानुसार लहान जनावरांमध्ये दोन घटक गृहित धरले जातात़ त्यामुळे लहान जनावरांची घटक संख्या ४५ हजार ६५५ एवढी असून, शेळ्या-मेंढ्या १ लाख ५९ हजार ५५९ एवढ्या असून, त्यांची घटक संख्या १५ हजार ९५६ एवढी आहे़ जिल्ह्यामध्ये ४ लाख ४२ हजार ४०४ पशूधन घटक उपलब्ध असून, या घटकांनुसार चाऱ्याचे नियोजन करण्यात येते़ 

चाऱ्यासाठी २५ लाखांची मागणीभविष्यात जिल्ह्यामध्ये चारा कमी पडू नये, यासाठी चारा उत्पादनाचाही उपक्रम राबविण्यात येणार असून, चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनामार्फत बियाणांचे वाटप करण्यासाठी पूनर्विनियोजन अंतर्गत २५ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ 

१ कोटी ८८ लाखांची नोंदविली मागणीजिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यामध्ये चाऱ्याची टंचाई वाढू शकते़ त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे होईल़ पशू संवर्धन विभागामार्फत गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे़ भविष्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तर चारा छावण्या उभाराव्या लागतील़ त्यासाठी शासनाकडे १ कोटी ८८ लाख रुपयांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ़ संजीव खोडवे यांनी दिली़ 

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी