परभणी : शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारने शेतकऱ्यांवर बळाचा वापर न करता त्यांच्या भावना व भूमिका समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी परभणीत केले.
परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने बुधवारी जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी ५ मार्च रोजी मुंबईत शक्तीपीठ महामार्गाबाबत बैठक घेण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. एकाही शेतकऱ्याने मोजणीस सहमती दिलेली नसून प्रशासनाने बळाचा वापर करू नये, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इकबाल, किशोर रनेर, डॉ. निलेश दळवे, बालाजी मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
वडिलोपार्जित जमिनी हिसकावून घेऊ नयेत – खासदार संजय जाधवशक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी बळजबरीने हिसकावून घेऊ नयेत, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. सहजपूर जवळा येथे महसूल व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून त्यांना दैठणा व ताडकळस पोलीस ठाण्यात कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी जमिनी द्यायला तयार नसताना हा रस्ता नेमका शेतकऱ्यांसाठी आहे की उद्योगपतींसाठी, हे सरकारने स्पष्ट करावे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
Web Summary : Manoj Jarange Patil urged a farmer-friendly decision on the Shaktipeeth highway. After meeting with protesting farmers, he spoke with a minister, securing a meeting on March 5th to address their concerns, urging authorities to avoid force.
Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने शक्तिपीठ राजमार्ग पर किसान-हितैषी निर्णय का आग्रह किया। प्रदर्शनकारी किसानों से मिलने के बाद, उन्होंने एक मंत्री से बात की, उनकी चिंताओं को दूर करने के लिए 5 मार्च को एक बैठक सुरक्षित की, अधिकारियों से बल प्रयोग से बचने का आग्रह किया।