परभणी: प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असतानाच, प्रशासनाने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोजणीपूर्वी मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी परभणी, गंगाखेड आणि दैठणा परिसरातून तब्बल दहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली आहे.
पहाटेच्या वेळी घराचे दरवाजे ठोठावलेशक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांनी 'प्रतिबंधात्मक कारवाई'च्या नावाखाली धरपकड सुरू केली आहे. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास परभणी शहरातील शिवलिंग बोधने आणि अमोल जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन नानलपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तसेच, कोल्हापूरहून परतणाऱ्या किशोर ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांना गंगाखेडच्या परळी नाक्यावर रात्री १० वाजताच रोखून ताब्यात घेण्यात आले.
गावोगावी पोलिसांच्या धाडीदुसरीकडे, दैठणा पोलीस आणि जिल्हा पथकाने उमरी येथील प्रसाद गोरे यांच्यासह चौघांना पहाटे पाच वाजता ताब्यात घेतले. या सर्व कारवाया मोजणीच्या दिवशी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे मध्यरात्री घरातून उचलल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मोजणी की रणकंदन?आज २० फेब्रुवारी रोजी सहजपूर आणि जवळा शिवारात मोजणी होणार आहे. मोजणीपूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या धरपकडीमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासन एकीकडे 'शेतकरी हिता'चे दावे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसी बळाचा वापर करून जमिनी हिसकावून घेत असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. आजची मोजणी शांततेत पार पडणार की जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी पडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Parbhani police arrested ten activists opposing Shaktipeeth Highway land measurement. Raids occurred pre-measurement, sparking farmer outrage. Authorities claim action prevents unrest; critics question police tactics as measurement proceeds.
Web Summary : परभणी पुलिस ने शक्तिपीठ राजमार्ग भूमि माप का विरोध करने वाले दस कार्यकर्ताओं को गिरफ्तार किया। माप से पहले छापे, किसानों का आक्रोश भड़का। अधिकारियों का दावा है कि कार्रवाई अशांति को रोकती है; आलोचकों ने पुलिस की रणनीति पर सवाल उठाए क्योंकि माप आगे बढ़ रहा है।