शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठांची लसीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

शहर मनपाने शनिवारी सर्व केंद्रांवर लसीकरण होईल व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळेल, असे प्रसिद्धीपत्रक शुक्रवारी काढले होते. त्यानुसार ...

शहर मनपाने शनिवारी सर्व केंद्रांवर लसीकरण होईल व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळेल, असे प्रसिद्धीपत्रक शुक्रवारी काढले होते. त्यानुसार पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या अनेकांना लसीकरणाचे एसएमएस मोबाईलवर मागील २ दिवसांत प्राप्त झाले होते. हे एसएमएस आलेले नागरिक शनिवारी बाल विद्यामंदिर, शंकरनगर, खंडोबा बाजार येथील केंद्रांवर सकाळी १० ते १२ च्या दरम्यान आले होते. मात्र, यातील प्रत्येकाला लस नसल्याचे कारण देत दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगितले. सर्वच केंद्रांवर १८ ते ४४ च्या नागरिकांचे लसीकरण शनिवारी सुरू होते. प्रत्येक केंद्राला किमान २०० डोस शनिवारच्या लसीकरणासाठी उपलब्ध करून दिले होते. तरीही ज्येष्ठ नागरिक यांना लस दिली नसल्याचे बाल विद्यामंदिर, खंडोबा बाजार येथील केंद्रावर ११.३० ते १२.३० च्या दरम्यान केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.

जायकवाडीत टोकन संपले

शहरात दररोज सकाळी केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने टोकन वाटप केले जात आहे. शनिवारी सकाळी जायकवाडीचे सर्व टोकन १० वाजेपूर्वी संपले. यानंतर येथे इतर केंद्रांवर लसीकरणाला गेलेले अनेक नागरिक ऑटो करून, तसेच खासगी वाहनाने मोठ्या आशेने लस मिळेल, यासाठी जायकवाडी केंद्रावर आले होते. येथे आल्यावर त्यांना टोकन संपले आणि टोकनप्रमाणे नोंदणी केलेल्यांना लस मिळेल, इतरांना नाही, असे सांगून परत पाठविण्यात आले.

माहिती घेऊन कळवितोे

लसीकरणाच्या झालेल्या प्रकाराबाबत आयुक्त देविदास पवार यांना दुपारी २.३७ वाजता फोन केला. यावेळी त्यांनी महिती घेऊन तुम्हाला कळवितो, असे सांगितले. परत त्यांचा फोन आला नाही.

मला प्राप्त झालेल्या दुसऱ्या डोसच्या एसएमएसप्रमाणे मी शनिवारी सकाळी ११ वाजता बाल विद्यामंदिर येथील केंद्रावर आलो. येथे लस मिळत नसल्याने शहरातील ५ केंद्रांवर खेटे मारले. परंतु, मला शनिवारी लस मिळाली नाही.

- अजय काळे, परभणी.

नागरिकांत नाराजी

शंकरनगर, खंडोबा बाजार यासह अन्य १० केंद्रांवर शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी ७ वाजता जाऊन टोकन घेतले. यानंतर जेवण करून सेंटरला आल्यावर ४५ वर्षांवरील नागरिकांना आज डोस मिळणार नाही, असे नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे टोकन देताना किंवा प्रेसनोटमध्ये लस कुठे उपलब्ध आहे, हे नमूद करून आधी कळवावे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. झालेल्या प्रकाराबद्दल अनेकांनी मनपाच्या कारभाराबद्दल नाराजी बोलून दाखविली.