शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठांची लसीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

शहर मनपाने शनिवारी सर्व केंद्रांवर लसीकरण होईल व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळेल, असे प्रसिद्धीपत्रक शुक्रवारी काढले होते. त्यानुसार ...

शहर मनपाने शनिवारी सर्व केंद्रांवर लसीकरण होईल व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळेल, असे प्रसिद्धीपत्रक शुक्रवारी काढले होते. त्यानुसार पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या अनेकांना लसीकरणाचे एसएमएस मोबाईलवर मागील २ दिवसांत प्राप्त झाले होते. हे एसएमएस आलेले नागरिक शनिवारी बाल विद्यामंदिर, शंकरनगर, खंडोबा बाजार येथील केंद्रांवर सकाळी १० ते १२ च्या दरम्यान आले होते. मात्र, यातील प्रत्येकाला लस नसल्याचे कारण देत दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगितले. सर्वच केंद्रांवर १८ ते ४४ च्या नागरिकांचे लसीकरण शनिवारी सुरू होते. प्रत्येक केंद्राला किमान २०० डोस शनिवारच्या लसीकरणासाठी उपलब्ध करून दिले होते. तरीही ज्येष्ठ नागरिक यांना लस दिली नसल्याचे बाल विद्यामंदिर, खंडोबा बाजार येथील केंद्रावर ११.३० ते १२.३० च्या दरम्यान केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.

जायकवाडीत टोकन संपले

शहरात दररोज सकाळी केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने टोकन वाटप केले जात आहे. शनिवारी सकाळी जायकवाडीचे सर्व टोकन १० वाजेपूर्वी संपले. यानंतर येथे इतर केंद्रांवर लसीकरणाला गेलेले अनेक नागरिक ऑटो करून, तसेच खासगी वाहनाने मोठ्या आशेने लस मिळेल, यासाठी जायकवाडी केंद्रावर आले होते. येथे आल्यावर त्यांना टोकन संपले आणि टोकनप्रमाणे नोंदणी केलेल्यांना लस मिळेल, इतरांना नाही, असे सांगून परत पाठविण्यात आले.

माहिती घेऊन कळवितोे

लसीकरणाच्या झालेल्या प्रकाराबाबत आयुक्त देविदास पवार यांना दुपारी २.३७ वाजता फोन केला. यावेळी त्यांनी महिती घेऊन तुम्हाला कळवितो, असे सांगितले. परत त्यांचा फोन आला नाही.

मला प्राप्त झालेल्या दुसऱ्या डोसच्या एसएमएसप्रमाणे मी शनिवारी सकाळी ११ वाजता बाल विद्यामंदिर येथील केंद्रावर आलो. येथे लस मिळत नसल्याने शहरातील ५ केंद्रांवर खेटे मारले. परंतु, मला शनिवारी लस मिळाली नाही.

- अजय काळे, परभणी.

नागरिकांत नाराजी

शंकरनगर, खंडोबा बाजार यासह अन्य १० केंद्रांवर शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी ७ वाजता जाऊन टोकन घेतले. यानंतर जेवण करून सेंटरला आल्यावर ४५ वर्षांवरील नागरिकांना आज डोस मिळणार नाही, असे नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे टोकन देताना किंवा प्रेसनोटमध्ये लस कुठे उपलब्ध आहे, हे नमूद करून आधी कळवावे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. झालेल्या प्रकाराबद्दल अनेकांनी मनपाच्या कारभाराबद्दल नाराजी बोलून दाखविली.