शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

कीचकट नियमांत अडकले परभणी जिल्ह्यातील टंचाईचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:26 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी आखडता हात घेतला जात असल्याचीही ओरड होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी आखडता हात घेतला जात असल्याचीही ओरड होत आहे़परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्पात असलेल्या पाण्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची दाहकता कमी असली तरी टंचाई नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यात नाही़ सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा आणि जिंूतर या तालुक्यांमध्ये पाणीसाठे आटले आहेत़जिंतूरच्या येलदरी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही़ गंगाखेड तालुक्यातही मासोळी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे़ अनेक गावांमधील हातपंप आणि विहिरींची पाणी पातळी खालावल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ अशा परिस्थितीत प्रशासनाने पाणीपुरवठा करावा, यासाठी ग्रामपंचायतींकडून टँकर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले जात आहेत़जिल्ह्यात तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार प्रकल्प राबविला जात आहे़ खेडी टँकरमुक्त करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असून, जिल्ह्यात ज्या गावांमध्ये हा प्रकल्प राबविला ती गावे टँकरमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये कामे झाली नाहीत़ त्यामुळे आता या गावांमधून टँकरचे प्रस्ताव आल्यानंतर तेथे टँकर देताना प्रशासनाची गोची होत आहे़ परिणामी टँकरचे प्रस्ताव मंजूर न करता त्या ठिकाणी पुरक पाणीपुरवठा योजना राबविणे, विहीर अधिग्रहण करणे, विहीर खोलीकरण करणे अशी पर्यायी कामे केली जात आहेत़ परंतु, टँकर दिला जात नाही़ त्यामुळे टँकर वगळता होणाऱ्या कामांना विलंब लागत असून, ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्याचप्रमाणे यावर्षी टंचाईच्या प्रस्तावांना मंजुरी देताना अनेक किचकट अटी घातल्याने प्रस्ताव विलंबाने मंजूर होत असल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे़ त्यामुळे प्रस्ताव दाखल केल्यानंतर एक ते दीड महिना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ ही सर्व परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन प्रस्ताव अधिक काळ प्रलंबित न ठेवता तो निकाली काढावा, अशी मागणी होत आहे़- विशेष पान /हॅलो ४

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई