शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

कीचकट नियमांत अडकले परभणी जिल्ह्यातील टंचाईचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:26 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी आखडता हात घेतला जात असल्याचीही ओरड होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी आखडता हात घेतला जात असल्याचीही ओरड होत आहे़परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्पात असलेल्या पाण्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची दाहकता कमी असली तरी टंचाई नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यात नाही़ सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा आणि जिंूतर या तालुक्यांमध्ये पाणीसाठे आटले आहेत़जिंतूरच्या येलदरी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही़ गंगाखेड तालुक्यातही मासोळी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे़ अनेक गावांमधील हातपंप आणि विहिरींची पाणी पातळी खालावल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ अशा परिस्थितीत प्रशासनाने पाणीपुरवठा करावा, यासाठी ग्रामपंचायतींकडून टँकर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले जात आहेत़जिल्ह्यात तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार प्रकल्प राबविला जात आहे़ खेडी टँकरमुक्त करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असून, जिल्ह्यात ज्या गावांमध्ये हा प्रकल्प राबविला ती गावे टँकरमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये कामे झाली नाहीत़ त्यामुळे आता या गावांमधून टँकरचे प्रस्ताव आल्यानंतर तेथे टँकर देताना प्रशासनाची गोची होत आहे़ परिणामी टँकरचे प्रस्ताव मंजूर न करता त्या ठिकाणी पुरक पाणीपुरवठा योजना राबविणे, विहीर अधिग्रहण करणे, विहीर खोलीकरण करणे अशी पर्यायी कामे केली जात आहेत़ परंतु, टँकर दिला जात नाही़ त्यामुळे टँकर वगळता होणाऱ्या कामांना विलंब लागत असून, ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्याचप्रमाणे यावर्षी टंचाईच्या प्रस्तावांना मंजुरी देताना अनेक किचकट अटी घातल्याने प्रस्ताव विलंबाने मंजूर होत असल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे़ त्यामुळे प्रस्ताव दाखल केल्यानंतर एक ते दीड महिना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ ही सर्व परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन प्रस्ताव अधिक काळ प्रलंबित न ठेवता तो निकाली काढावा, अशी मागणी होत आहे़- विशेष पान /हॅलो ४

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई