शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:55 IST

पाथरी येथील नागरिकांच्या अपेक्षा

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या सूचनेवरूनच या जन्मभूमीच्या विकासाचा आराखडा जन्मभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने एक पाऊल उचलले

पाथरी (जि़परभणी) : राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांकडून जन्मभूमीबाबत वाद उकरून काढला जात आहे़ त्यामुळे पाथरीतील भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून, संत साई यांच्या कर्मभूमीच्या धर्तीवर पाथरी येथील जन्मभूमीचाही विकास होत आहे़ त्यात आडकाठी आणू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ 

पाथरी येथील संत साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील बैठकीत मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांनी साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद उकरून काढला़ या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर भाविकांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थळ आहे़ याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत़ याविषयीची चर्चा करीत शिर्डीतील भाविकांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली़ गोदावरी काठावरील पाथरी तालुक्याचा उल्लेख प्राचीन काळात पार्थपूर, पार्थग्राम असा आढळतो़

पाथरी शहरात साईबाबा यांचा जन्म झाल्याचे संशोधन आणि पुराव्यांनी सिद्ध झाले आहे़ आजही येथील मंदिरात साईबाबांच्या वस्तू जपून ठेवल्या आहेत़ विश्वास टिळक यांनी १९७५ मध्ये साईबाबांच्या जन्मभूमीला भेट देऊन संशोधन सुरू केले़ त्यांच्या संशोधनानंतर अनेक पुरावे त्यांनी जमा केले़ साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हेच असल्याचे सिद्ध झाले आहे़ विशेष म्हणजे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही पाथरी येथे भेट देऊन साई जन्मभूमीच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या़ आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी रामनाथ कोविंद यांच्याकडे साई जन्मभूमीच्या विकासाचे साकडे घातले़ त्यानंतर राष्ट्रपतींच्या सूचनेवरूनच या जन्मभूमीच्या विकासाचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता़ तत्कालीन भाजप शासनाने त्यास मंजुरी दिली नाही. मात्र महाविकास आघाडी शासनाने त्यास मंजुरीही दिली़ त्यामुळे या जन्मभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने एक पाऊल उचलले असून, शिर्डीवासीयांच्या विरोधामुळे पाथरीकरांत नाराजी व्यक्त होत आहे़

पाथरी ही जन्मभूमी असल्याचे अनेक पुरावेशिर्डी ही साईबाबांची कर्मभूमी आहे, तर पाथरी जन्मभूमी आहे, हे अनेक पुरावे आणि संशोधनाने सिद्ध झाले आहे़ कॅनडामधील एका दाम्पत्याने १९९४ साली पाथरीत साईजन्मभूमीचे संशोधन केले़ त्यावेळी सुविधा नव्हत्या़ त्यांच्या संशोधनासाठी मी स्वत: प्रयत्न केले़ त्यानंतर राष्ट्रपती रामराथ कोविंद हे देखील या दृष्टीने सकारात्मक आहेत़ शासनानेही मदतीची भूमिका घेतली आहे़ तेव्हा शिर्डीवासीयांनी जन्मभूमीचा वाद उकरून काढू नये़ शिर्डीच्या रुपात पाथरीचा विकास व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे, असे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.

टॅग्स :saibabaसाईबाबाparabhaniपरभणीshirdiशिर्डी