शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

दोन्ही लाटेत ग्रामीण भाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ ...

मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ होत गेली. पहिला लाटेमध्ये केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली; मात्र दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली. प्रत्येकदिवशी ४०० ते ५०० रुग्ण नोंद झाले. जिल्ह्यातील हा संसर्ग आता कमी झाला असला, तरी दोन्ही लाटेत नोंद झालेल्या एकूण ५० हजार ७०४ रुग्णांपैकी ग्रामीण भागांमध्ये ३० हजार ३६५ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. शहरी भागाशी तुलना करता, ग्रामीण भागात ५९.८८ टक्के रुग्ण नोंद झाले आहेत. उर्वरित रुग्ण शहरी भागातील आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची ही आकडेवारी पाहता, येत्या काळात शहरापेक्षा ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा फारशी मजबूत नव्हती. कोरोनाच्या तपासण्याबरोबरच रुग्णांचे रुग्णालयांमध्ये दाखले होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. परिणामी ग्रामीण भागात हा संसर्ग वेगाने वाढत गेला. गावेच्या गावे कोरोना बाधित झाली. जिल्ह्यात ८०४ गावे असून, त्यापैकी ७११ गावांमध्ये कोरोना पोहोचला. ही बाब लक्षात घेता, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.

एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिना जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरला. या काळात सर्वाधिक २३ हजार २२ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२० अखेर जिल्ह्यात केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल ४३ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ३३५, फेब्रुवारी महिन्यात ६४४, मार्चमध्ये ६ हजार ७७३, एप्रिल महिन्यात २३ हजार २२ आणि मे महिन्यामध्ये १२ हजार ३७९ रुग्णांची नोंद झाली आहे.

तोकडी आरोग्य सुविधा

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून आरोग्य सेवा दिली जाते; मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता, ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.