शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दोन्ही लाटेत ग्रामीण भाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ ...

मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ होत गेली. पहिला लाटेमध्ये केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली; मात्र दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली. प्रत्येकदिवशी ४०० ते ५०० रुग्ण नोंद झाले. जिल्ह्यातील हा संसर्ग आता कमी झाला असला, तरी दोन्ही लाटेत नोंद झालेल्या एकूण ५० हजार ७०४ रुग्णांपैकी ग्रामीण भागांमध्ये ३० हजार ३६५ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. शहरी भागाशी तुलना करता, ग्रामीण भागात ५९.८८ टक्के रुग्ण नोंद झाले आहेत. उर्वरित रुग्ण शहरी भागातील आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची ही आकडेवारी पाहता, येत्या काळात शहरापेक्षा ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा फारशी मजबूत नव्हती. कोरोनाच्या तपासण्याबरोबरच रुग्णांचे रुग्णालयांमध्ये दाखले होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. परिणामी ग्रामीण भागात हा संसर्ग वेगाने वाढत गेला. गावेच्या गावे कोरोना बाधित झाली. जिल्ह्यात ८०४ गावे असून, त्यापैकी ७११ गावांमध्ये कोरोना पोहोचला. ही बाब लक्षात घेता, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.

एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिना जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरला. या काळात सर्वाधिक २३ हजार २२ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२० अखेर जिल्ह्यात केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल ४३ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ३३५, फेब्रुवारी महिन्यात ६४४, मार्चमध्ये ६ हजार ७७३, एप्रिल महिन्यात २३ हजार २२ आणि मे महिन्यामध्ये १२ हजार ३७९ रुग्णांची नोंद झाली आहे.

तोकडी आरोग्य सुविधा

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून आरोग्य सेवा दिली जाते; मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता, ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.