शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

लोकचळवळीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

परभणी : ग्रामीण भागामध्ये स्वच्छता आणि शिक्षणाची लोकचळवळ उभी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य ...

परभणी : ग्रामीण भागामध्ये स्वच्छता आणि शिक्षणाची लोकचळवळ उभी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

टाकसाळे यांच्यासह अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या गुड मॉर्निंग पथकाने २५ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे भेट देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापक अनिल सावळे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून यापुढे गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्याच्याकडून शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याचा दाखला घेणार असल्याचे सावळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व गाव विकासात अनिल सावळे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

डिजिटल शाळा, स्काऊट गाईडचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांतील शिस्त, शालेय स्वच्छता, परिसर स्वच्छता, लोकसहभागातून होत असलेले शाळेचे बांधकाम, प्लास्टिक मुक्तीची मोहीम हे सगळे उपक्रम मुख्याध्यापक अनिल सावळे यांनी राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर ग्रामसेविका मनीषा लोमटे, सीडीपीओ बी. टी. मुंढे, सुपरवायझर एम. एम. भोंग यांनी महिला व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाव स्वच्छतेसाठी व प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.

गावच्या विकासासाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील इतर शिक्षक व कर्मचारी मंडळींनीदेखील गाव स्वच्छतेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, गटविकास अधिकारी सुनीता वानखेडे, गटशिक्षण अधिकारी संजय ससाने, विस्तार अधिकारी वसंत कांबळे, तुळशीराम राठोड, वसंत ईखे, सचिन पठाडे, बलभीम मातेले, अशोक गोरे, नरेंद्र कांबळे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील अधिकारी, कर्मचारी, आशाताई अंगणवाडी ताई आदींची उपस्थिती होती.