शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

शहरातील रस्त्यांची कामे निधीअभावी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट परभणी : जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट होत आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस ...

जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट

परभणी : जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट होत आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. भूजल पातळी खोल जात असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.

ग्रामीण रेल्वे प्रवाशांना आर्थिक झळा

परभणी : रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वे गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सर्वसाधारणपणे सवारी रेल्वे गाड्यांना १०ते २० रुपये तिकिट असताना याच प्रवासासाठी ७०ते ९० रुपये मोजावे लागत आहेत. यात लघू व्यावसायिकांचे सर्वाधिक नुकसान आहे.

बारा कि.मी.च्या रस्त्यावर अनेक खड्डेश

पिंगळी : परभणी ते पिंगळी या १२ कि.मी. अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मध्यंतरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम संथगतीने सुरू आहे. सध्या हा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पिंगळीसह परिसरातील पाच ते सात गावांतील ग्रामस्थांसाठी हा दररोजचा वर्दळीचा रस्ता आहे.

रबी हंगामातील पीक काढणी सुरू

पिंगळी : परभणी तालुक्यातील पिंगळी व परिसरात रबी हंगामातील पिकांची काढणी सुरू झाली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी काढणीची लगबग सुरू केली आहे. गहू, ज्वारी आणि हळद या पिकाची सध्या काढणी सुरू आहे. काढणी केलेले पीक सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

पुलाच्या कामामुळे वाहतूक ठप्प

परभणी : येथील रेल्वेस्थानकाजवळील विद्यापीठ गेट परिसरात रेल्वेचा उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा मार्ग मागील दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य गेटचा वापर करावा लागत आहे.

वाहतूक सिग्नल दहा वर्षांपासून बंद

परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेले सिग्नल मागच्या दहा वर्षांपासून बंद आहेत. लाखो रुपयांचा खर्च करुन ही यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र केवळ नियोजनाच्या अभावामुळे सिग्नल धूळ खात उभे आहेत. सध्या शहरात वाहनांची संख्या वाढली असून, या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.

जायकवाडी कालव्यात गाळ

परभणी : जिल्ह्यातून जाणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यात गाळ साचला आहे. त्यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर हे पाणी टेलपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे लाभक्षेत्रात येत असतानाही शेतकऱ्यांना जायकवाडीच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने जायकवाडी कालव्यातील गाळ उपसून घ्यावा, अशी मागणी होत आहे.