शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

परतीच्या पावसाचा फटका; कापसाच्या वाती अन् सोयाबीनची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:04 IST

Return rain hits Parabhani : परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली.

ठळक मुद्देरबी पेरणीसाठी अडचणीपुराचे पाणी शेतात शिरल्याने हानी

परभणी : परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस तुटलेला होता. या फुटलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. तसेच काढून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली. मागील पंधरा दिवसापूर्वी परभणीसह जिल्ह्यात  पाऊस धो-धो बरसला.  या पावसामुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे अद्यापही संपूर्ण पंचनामे झाले नाहीत, तोच आता परतीच्या पावसाने  धुमाकूळ घातला आहे. या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उघडीप दिल्यानंतर कापूस मोठ्या प्रमाणात फुटला होता. काही शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांची कापसाची वेचणी राहिली होती. या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे. अनेकांची काढणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पूर्णतः भिजली आहे. पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा, परभणीसह अन्य तालुक्यातील नदी-नाल्यांना पाणी आले होते. सर्वच ठिकाणच्या नद्या तुडुंब वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पुराचे पाणी शेतात शिरल्याने हानीनदीकाठच्या शेतशिवारात पुराचे पाणी पिकांमध्ये साचून राहिल्याने पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. तसेच सोयाबीनला डाग पडल्याने भावही अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.

रब्बी अडचणीत खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस