शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

परभणी जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी नसल्याचा परिणाम :२५ हजार एकरवरील शेती पडली पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:35 IST

यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे २००६ मध्ये उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले आहेत़ तर दुसºया बाजुने जायकवाडी धरणाचा डावा कालवा तालुक्यातून गेला आहे़ दोन्ही बाजुंनी सिंचन सुविधा उपलब्ध आहेत़ चांगल्या पाऊसकाळात या भागात मोठे सिंचन होत असे़ त्यामुळे बारमाही बागायती पिकेही घेतली जात होती़ एकेकाळी हा भाग सुजलाम सुफलाम असल्याचे दिसून येत होते़ मागील काही वर्षांत निसर्गाचे चित्र पालटले गेले आणि पावसाळ्यात पाहुण्यासारखा पाऊस बरसू लागला़ त्यामुळे या तालुक्यात मागील चार वर्षापासून शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ २०१७-१८ या वर्षात तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला़ परंतु, जायकवाडीचे धरण हे १०० टक्के भरले गेले़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी या धरणातून ३ आणि उन्हाळी हंगामात बारमाही व उन्हाळी पिकांसाठी ३ असे ६ पाणी आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आले होते़ यावर्षी तर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़ मुदगल व ढालेगाव हे दोन्ही बंधारे कोरडेठाक पडले आहेत तर जायकवाडीचे पाणीही यावर्षी मिळाले नाही़परिणामी सिंचनाचे सर्व पर्याय बंद झाले़ या भागातील सिंचन आणि पिण्याचे पाणी जायकवाडीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे वास्तव यावर्षी पुढे आले आहे़डाव्या कालव्यावर भिस्तजायकवाडीचा मुख्य डावा कालवा पाथरी भागातील वरखेड येथून सुरू होतो़ पाथरी उपविभागीय कार्यालयांतर्गत पाथरी, मानवत आणि परभणी तालुक्यातील काही भाग येतो़ जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टर क्षेत्राची मदार आहे़ त्यामुळे यावर्षी पाऊसच झाला नसल्याने बंधाºयाबरोबरच जायकवाडीतूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे या ३६ हजार हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागला़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी