शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

परभणी जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी नसल्याचा परिणाम :२५ हजार एकरवरील शेती पडली पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:35 IST

यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे २००६ मध्ये उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले आहेत़ तर दुसºया बाजुने जायकवाडी धरणाचा डावा कालवा तालुक्यातून गेला आहे़ दोन्ही बाजुंनी सिंचन सुविधा उपलब्ध आहेत़ चांगल्या पाऊसकाळात या भागात मोठे सिंचन होत असे़ त्यामुळे बारमाही बागायती पिकेही घेतली जात होती़ एकेकाळी हा भाग सुजलाम सुफलाम असल्याचे दिसून येत होते़ मागील काही वर्षांत निसर्गाचे चित्र पालटले गेले आणि पावसाळ्यात पाहुण्यासारखा पाऊस बरसू लागला़ त्यामुळे या तालुक्यात मागील चार वर्षापासून शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ २०१७-१८ या वर्षात तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला़ परंतु, जायकवाडीचे धरण हे १०० टक्के भरले गेले़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी या धरणातून ३ आणि उन्हाळी हंगामात बारमाही व उन्हाळी पिकांसाठी ३ असे ६ पाणी आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आले होते़ यावर्षी तर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़ मुदगल व ढालेगाव हे दोन्ही बंधारे कोरडेठाक पडले आहेत तर जायकवाडीचे पाणीही यावर्षी मिळाले नाही़परिणामी सिंचनाचे सर्व पर्याय बंद झाले़ या भागातील सिंचन आणि पिण्याचे पाणी जायकवाडीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे वास्तव यावर्षी पुढे आले आहे़डाव्या कालव्यावर भिस्तजायकवाडीचा मुख्य डावा कालवा पाथरी भागातील वरखेड येथून सुरू होतो़ पाथरी उपविभागीय कार्यालयांतर्गत पाथरी, मानवत आणि परभणी तालुक्यातील काही भाग येतो़ जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टर क्षेत्राची मदार आहे़ त्यामुळे यावर्षी पाऊसच झाला नसल्याने बंधाºयाबरोबरच जायकवाडीतूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे या ३६ हजार हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागला़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी