शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात २८७ कोटी बँकांना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनी मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीककर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र त्यानंतरच्या वर्षातही शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली़ या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नावही दिले़ कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले होते़ जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रावरून २२ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. शेतकºयांनी दाखल केलेल्या अर्जांची तालुका आणि गावनिहाय यादी करून चावडी वाचनही झाले़ सर्व शेतकºयांची दिवाळी कर्जमाफीच्या माध्यमातून गोड करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते; परंतु, दिवाळीचा सण उलटून जवळपास २ महिन्यांचा कालावधी होत आहे़ मात्र अद्याप सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे दिसत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल केलेल्या ३ लाख शेतकºयांपैकी ६५ हजार ३२७ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.जनजागृतीचा अभावकर्जमाफी झाल्याची माहिती लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली, याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.२९ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची २८७ कोटी रुपयांची रक्कम बँकांना मिळाली असली तरी आपले खाते कोरे झाले का? याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.‘आपले सरकार’वरही मिळेना माहितीजिल्ह्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईनच्या माध्यमातून जवळपास २ महिन्यांपूर्वी अर्ज अपलोड केले आहेत. मात्र कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे नाव आले की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली होती. या योजनेत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट पोर्टलवर टाकण्यात येत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने या पोर्टलवरील ही माहिती बंद केली आहे. त्यामुळे बँकांना जरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली असली तरी यातील नेमके लाभार्थी शेतकरी कोणते, हे मात्र समजेनासे झाले आहे. तसेच कर्जमाफीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येऊ नये, असे निर्बंध बँकांना घालण्यात आले आहेत. शासनाने ‘आपले सरकार’वरील माहिती पूर्ववत करावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.बँकांना मिळालेली कर्जमाफीची रक्कमजिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकºयांनी आॅनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे. यामध्ये अलहाबाद बँकेतील २ हजार ६ शेतकºयांसाठी १४ कोटी ५४ लाख, आंध्रा बँकेतील ६२ शेतकºयांसाठी २९ लाख, बँक आॅफ बडोदामधील ५६५ शेतकºयांसाठी ४ कोटी ३२ लाख, बँक आॅफ इंडियामधील २३३ शेतकºयांसाठी १ कोटी ३५ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र बँकेतील ५ हजार ५४२ शेतकºयांसाठी ३६ कोटी ८५ लाख, कॅनरा बँकेतील ६७४ शेतकºयांसाठी ४ कोटी १८ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३१६ शेतकºयांसाठी २ कोटी १८ लाख, देना बँकेतील १६६ शेतकºयांसाठी १ कोटी ११ लाख, आयडीबीआय बँकेतील २१७ शेतकºयांसाठी ३६ लाख, पंजाब नॅशनल बँकेतील ५२ शेतकºयांसाठी ३१ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियामधील ३० हजार १२३ शेतकºयांसाठी ८२ कोटी १७ लाख, सिंडीकेट बँकेतील २१६ शेतकºयांसाठी १ कोटी ५२ लाख, युको बँकेतील २ हजार ५५१ शेतकºयांसाठी ७ कोटी ४६ लाख, युनियन बँकेतील ६९८ शेतकºयांसाठी ५ कोटी १३ लाख, विजया बँकेतील १९३ शेतकºयांसाठी १ कोटी ५ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ६ हजार ३२ शेतकºयांसाठी १२ कोटी ८२ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १५ हजार ६८१ शेतकºयांसाठी सर्वाधिक ११० कोटी ९७ लाख रुपयांच्या रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे.