शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

परभणी जिल्ह्यात २८७ कोटी बँकांना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनी मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीककर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र त्यानंतरच्या वर्षातही शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली़ या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नावही दिले़ कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले होते़ जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रावरून २२ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. शेतकºयांनी दाखल केलेल्या अर्जांची तालुका आणि गावनिहाय यादी करून चावडी वाचनही झाले़ सर्व शेतकºयांची दिवाळी कर्जमाफीच्या माध्यमातून गोड करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते; परंतु, दिवाळीचा सण उलटून जवळपास २ महिन्यांचा कालावधी होत आहे़ मात्र अद्याप सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे दिसत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल केलेल्या ३ लाख शेतकºयांपैकी ६५ हजार ३२७ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.जनजागृतीचा अभावकर्जमाफी झाल्याची माहिती लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली, याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.२९ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची २८७ कोटी रुपयांची रक्कम बँकांना मिळाली असली तरी आपले खाते कोरे झाले का? याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.‘आपले सरकार’वरही मिळेना माहितीजिल्ह्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईनच्या माध्यमातून जवळपास २ महिन्यांपूर्वी अर्ज अपलोड केले आहेत. मात्र कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे नाव आले की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली होती. या योजनेत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट पोर्टलवर टाकण्यात येत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने या पोर्टलवरील ही माहिती बंद केली आहे. त्यामुळे बँकांना जरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली असली तरी यातील नेमके लाभार्थी शेतकरी कोणते, हे मात्र समजेनासे झाले आहे. तसेच कर्जमाफीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येऊ नये, असे निर्बंध बँकांना घालण्यात आले आहेत. शासनाने ‘आपले सरकार’वरील माहिती पूर्ववत करावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.बँकांना मिळालेली कर्जमाफीची रक्कमजिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकºयांनी आॅनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे. यामध्ये अलहाबाद बँकेतील २ हजार ६ शेतकºयांसाठी १४ कोटी ५४ लाख, आंध्रा बँकेतील ६२ शेतकºयांसाठी २९ लाख, बँक आॅफ बडोदामधील ५६५ शेतकºयांसाठी ४ कोटी ३२ लाख, बँक आॅफ इंडियामधील २३३ शेतकºयांसाठी १ कोटी ३५ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र बँकेतील ५ हजार ५४२ शेतकºयांसाठी ३६ कोटी ८५ लाख, कॅनरा बँकेतील ६७४ शेतकºयांसाठी ४ कोटी १८ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३१६ शेतकºयांसाठी २ कोटी १८ लाख, देना बँकेतील १६६ शेतकºयांसाठी १ कोटी ११ लाख, आयडीबीआय बँकेतील २१७ शेतकºयांसाठी ३६ लाख, पंजाब नॅशनल बँकेतील ५२ शेतकºयांसाठी ३१ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियामधील ३० हजार १२३ शेतकºयांसाठी ८२ कोटी १७ लाख, सिंडीकेट बँकेतील २१६ शेतकºयांसाठी १ कोटी ५२ लाख, युको बँकेतील २ हजार ५५१ शेतकºयांसाठी ७ कोटी ४६ लाख, युनियन बँकेतील ६९८ शेतकºयांसाठी ५ कोटी १३ लाख, विजया बँकेतील १९३ शेतकºयांसाठी १ कोटी ५ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ६ हजार ३२ शेतकºयांसाठी १२ कोटी ८२ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १५ हजार ६८१ शेतकºयांसाठी सर्वाधिक ११० कोटी ९७ लाख रुपयांच्या रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे.