शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात २८७ कोटी बँकांना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनी मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीककर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र त्यानंतरच्या वर्षातही शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली़ या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नावही दिले़ कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले होते़ जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रावरून २२ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. शेतकºयांनी दाखल केलेल्या अर्जांची तालुका आणि गावनिहाय यादी करून चावडी वाचनही झाले़ सर्व शेतकºयांची दिवाळी कर्जमाफीच्या माध्यमातून गोड करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते; परंतु, दिवाळीचा सण उलटून जवळपास २ महिन्यांचा कालावधी होत आहे़ मात्र अद्याप सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे दिसत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल केलेल्या ३ लाख शेतकºयांपैकी ६५ हजार ३२७ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.जनजागृतीचा अभावकर्जमाफी झाल्याची माहिती लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली, याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.२९ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची २८७ कोटी रुपयांची रक्कम बँकांना मिळाली असली तरी आपले खाते कोरे झाले का? याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.‘आपले सरकार’वरही मिळेना माहितीजिल्ह्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईनच्या माध्यमातून जवळपास २ महिन्यांपूर्वी अर्ज अपलोड केले आहेत. मात्र कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे नाव आले की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली होती. या योजनेत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट पोर्टलवर टाकण्यात येत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने या पोर्टलवरील ही माहिती बंद केली आहे. त्यामुळे बँकांना जरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली असली तरी यातील नेमके लाभार्थी शेतकरी कोणते, हे मात्र समजेनासे झाले आहे. तसेच कर्जमाफीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येऊ नये, असे निर्बंध बँकांना घालण्यात आले आहेत. शासनाने ‘आपले सरकार’वरील माहिती पूर्ववत करावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.बँकांना मिळालेली कर्जमाफीची रक्कमजिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकºयांनी आॅनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे. यामध्ये अलहाबाद बँकेतील २ हजार ६ शेतकºयांसाठी १४ कोटी ५४ लाख, आंध्रा बँकेतील ६२ शेतकºयांसाठी २९ लाख, बँक आॅफ बडोदामधील ५६५ शेतकºयांसाठी ४ कोटी ३२ लाख, बँक आॅफ इंडियामधील २३३ शेतकºयांसाठी १ कोटी ३५ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र बँकेतील ५ हजार ५४२ शेतकºयांसाठी ३६ कोटी ८५ लाख, कॅनरा बँकेतील ६७४ शेतकºयांसाठी ४ कोटी १८ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३१६ शेतकºयांसाठी २ कोटी १८ लाख, देना बँकेतील १६६ शेतकºयांसाठी १ कोटी ११ लाख, आयडीबीआय बँकेतील २१७ शेतकºयांसाठी ३६ लाख, पंजाब नॅशनल बँकेतील ५२ शेतकºयांसाठी ३१ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियामधील ३० हजार १२३ शेतकºयांसाठी ८२ कोटी १७ लाख, सिंडीकेट बँकेतील २१६ शेतकºयांसाठी १ कोटी ५२ लाख, युको बँकेतील २ हजार ५५१ शेतकºयांसाठी ७ कोटी ४६ लाख, युनियन बँकेतील ६९८ शेतकºयांसाठी ५ कोटी १३ लाख, विजया बँकेतील १९३ शेतकºयांसाठी १ कोटी ५ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ६ हजार ३२ शेतकºयांसाठी १२ कोटी ८२ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १५ हजार ६८१ शेतकºयांसाठी सर्वाधिक ११० कोटी ९७ लाख रुपयांच्या रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे.