शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

परभणी जिल्ह्यात २८७ कोटी बँकांना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनी मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीककर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र त्यानंतरच्या वर्षातही शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली़ या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नावही दिले़ कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले होते़ जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रावरून २२ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. शेतकºयांनी दाखल केलेल्या अर्जांची तालुका आणि गावनिहाय यादी करून चावडी वाचनही झाले़ सर्व शेतकºयांची दिवाळी कर्जमाफीच्या माध्यमातून गोड करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते; परंतु, दिवाळीचा सण उलटून जवळपास २ महिन्यांचा कालावधी होत आहे़ मात्र अद्याप सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे दिसत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल केलेल्या ३ लाख शेतकºयांपैकी ६५ हजार ३२७ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.जनजागृतीचा अभावकर्जमाफी झाल्याची माहिती लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली, याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.२९ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची २८७ कोटी रुपयांची रक्कम बँकांना मिळाली असली तरी आपले खाते कोरे झाले का? याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.‘आपले सरकार’वरही मिळेना माहितीजिल्ह्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईनच्या माध्यमातून जवळपास २ महिन्यांपूर्वी अर्ज अपलोड केले आहेत. मात्र कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे नाव आले की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली होती. या योजनेत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट पोर्टलवर टाकण्यात येत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने या पोर्टलवरील ही माहिती बंद केली आहे. त्यामुळे बँकांना जरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली असली तरी यातील नेमके लाभार्थी शेतकरी कोणते, हे मात्र समजेनासे झाले आहे. तसेच कर्जमाफीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येऊ नये, असे निर्बंध बँकांना घालण्यात आले आहेत. शासनाने ‘आपले सरकार’वरील माहिती पूर्ववत करावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.बँकांना मिळालेली कर्जमाफीची रक्कमजिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकºयांनी आॅनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे. यामध्ये अलहाबाद बँकेतील २ हजार ६ शेतकºयांसाठी १४ कोटी ५४ लाख, आंध्रा बँकेतील ६२ शेतकºयांसाठी २९ लाख, बँक आॅफ बडोदामधील ५६५ शेतकºयांसाठी ४ कोटी ३२ लाख, बँक आॅफ इंडियामधील २३३ शेतकºयांसाठी १ कोटी ३५ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र बँकेतील ५ हजार ५४२ शेतकºयांसाठी ३६ कोटी ८५ लाख, कॅनरा बँकेतील ६७४ शेतकºयांसाठी ४ कोटी १८ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३१६ शेतकºयांसाठी २ कोटी १८ लाख, देना बँकेतील १६६ शेतकºयांसाठी १ कोटी ११ लाख, आयडीबीआय बँकेतील २१७ शेतकºयांसाठी ३६ लाख, पंजाब नॅशनल बँकेतील ५२ शेतकºयांसाठी ३१ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियामधील ३० हजार १२३ शेतकºयांसाठी ८२ कोटी १७ लाख, सिंडीकेट बँकेतील २१६ शेतकºयांसाठी १ कोटी ५२ लाख, युको बँकेतील २ हजार ५५१ शेतकºयांसाठी ७ कोटी ४६ लाख, युनियन बँकेतील ६९८ शेतकºयांसाठी ५ कोटी १३ लाख, विजया बँकेतील १९३ शेतकºयांसाठी १ कोटी ५ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ६ हजार ३२ शेतकºयांसाठी १२ कोटी ८२ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १५ हजार ६८१ शेतकºयांसाठी सर्वाधिक ११० कोटी ९७ लाख रुपयांच्या रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे.