शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

शेतकऱ्यांच्या पैशांवर अंबानींचा दरोडा, राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:27 IST

कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे

परभणी - कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी येथे केला़पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पीक विमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून आंदोलन उभे केले आहे़ शेट्टी यांनी रविवारी आंदोलकांची भेट घेतली़ शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच ते म्हणाले, पीक विम्या संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून, पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदविली आहे़ परंतु, मंत्री अंबानी यांच्या कार्पोरेट कंपनीसमोर गुडघे टेकत आहेत़ हा देश कार्पोरेट कंपनीला गहान ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला़कंपनीने ९ हजार ४१ कोटी रुपये विम्यापोटी जमा केले आणि परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे़ त्यामुळे ही योजना ‘अंबानी कल्याण योजना’ असल्याचेच दिसत आहे़ शेतकºयांवर तांत्रिक मुद्दे काढून गुन्हे दाखल केले जात आहेत़चंद्रकांत पाटील यांचा इतिहास कच्चाशेतकºयांच्या प्रश्नांवर आजपर्यंत मी अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत़ परंतु, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इतिहास कच्चा असल्याने ते आपल्यावर टीका करीत आहेत, असे शेट्टी म्हणाले. ऊस आंदोलनावर राजू शेट्टी मोठे झाले़ आता हा प्रश्न राहिला नसल्याने दुधाचे आंदोलन केले जात आहे, अशी टीका पाटील यांनी केली होती़ त्यावर शेट्टी म्हणाले, ११ वर्षांपूर्वी मी दुधाचे आंदोलन उभारले होते़ मुंबईचा दुध पुरवठा बंद केला होता़ ठेकेदारांकडून कोण टक्केवारी घेतात? यासह बºयाच गोष्टी मलाही काढता येतात, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीnewsबातम्या