शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्य ! जोरदार पाऊस झाल्यानंतरही मापकानुसार 'पर्जन्यच' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:39 IST

या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.

पाथरी : दोन गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतरही पर्जन्यमापकावर मात्र शून्य नोंद झाल्याने पर्जन्यमापकाविषयी आता शंका निर्माण झाल्या आहेत.

तालुक्यातील पावसाची नोंद घेण्यासाठी महसूल मंडळनिहाय पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत. पाथरी तालुक्यामध्ये तीन मंडळ असून तीन ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात आली आहेत. पाथरी मंडळात १३ गावे असून पाथरी शहरातील तहसील कार्यालयात पर्जन्यमापक बसविले आहे. २० जून रोजी रात्री या मंडळातील रेणापूर आणि वाघाळा या दोन गावांच्या शिवारात जोरदार पाऊस झाला. २१ जून रोजी पाथरी येथील पर्जन्यमापकावर या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र या पर्जन्यमापकाने शून्य मि.मी. पावसाची नोंद दर्शविली आहे. या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.

दुष्काळ ठेवण्यासाठी पाऊस महत्त्वाचा घटकमहसूल प्रशासनाने घेतलेल्या पावसाच्या नोंदीवरून जिल्ह्यातील दुष्काळाची आणि नुकसानीची नोंद घेतली जाते. त्यामुळे पर्जन्यमापक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मात्र या पर्जन्यमापकद्वारे अचूक नोंदी होत नसतील तर त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

या पावसाळी हंगामात पाथरी मंडळात दोन वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या भागातील पिकांचे कुठलेही नुकसान झाले नाही. तर दुसरीकडे दोन गावात मोठा पाऊस झाला असताना पर्जन्यमापकाने नोंदच घेतली नाही. पर्जन्यमापकाच्या नोंदीतील विसंगतीमुळे शंका  व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती