शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यवंशी संविधानाचा रक्षणकर्ता, पोलिसांनी त्याची हत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 05:58 IST

आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

परभणी : सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. संघाची विचारधारा ही संविधान संपविण्याची विचारधारा आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन दिल्याने तेही याला जबाबदार आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला.

संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यामुळे पुकारलेल्या परभणी बंददरम्यान ११ डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा १५ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी २:३५ च्या सुमारास परभणीत नवा मोंढा भागात जाऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची राहुल गांधी यांनी भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादनही केले. 

राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत वाकोडे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कुटुंबीयांच्या भावना ऐकून सांत्वनही केले. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे आदी उपस्थित होते.

हा राजकारण नव्हे, न्याय मिळवून देण्याचा विषय

राहुल म्हणाले, हा कोणतेही राजकारण करण्याचा विषय नाही. हा न्याय मिळवून देण्याचा विषय आहे. या घटनेला संघाची विचारधारा जबाबदार आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन दिले, त्यामुळे याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहिला, ही शंभर टक्के हत्या आहे : राहुल

राहुल म्हणाले की, ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांना मी भेटलो. त्यांनी पोस्टमार्टेम रिपोर्ट दाखविला. छायाचित्रे दाखविली. यातून पोलिसांनी त्यांची हत्या केल्याचे दिसत आहे. ही शंभर टक्के हत्या आहे. मागासवर्गीय असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. याची चौकशी करून संबंधितांना शिक्षा व्हावी.

द्वेष पसरवण्याचा राहुल यांचा उद्देश

राहुल गांधी हे केवळ राजकीय कारणांसाठी महाराष्ट्रात आले. त्यांचा उद्देश लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा आहे. आम्ही सर्व प्रकरणांची तपासणी करीत आहोत. हे प्रकरण न्यायालयात आहे. मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे सिद्ध झाले, तर कोणालाही सोडले जाणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

माझ्या मुलाला मारून पोलिसांनी हाडे मोडली

पोलिसांच्या मारहाणीत माझ्या मुलाची हाडे मोडली. माझ्या मुलाला अटक केली तर त्याची मला माहितीही दिली नव्हती. पोस्टमॉर्टममध्ये सगळे आले तरीही त्याला गंभीर आजार होता, असे चुकीचे सांगत आहेत, अशी व्यथा मृत सोमनाथ यांची आई विजया सूर्यवंशी यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParbhani policeपरभणी पोलीस