शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

सूर्यवंशी संविधानाचा रक्षणकर्ता, पोलिसांनी त्याची हत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 05:58 IST

आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

परभणी : सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. संघाची विचारधारा ही संविधान संपविण्याची विचारधारा आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन दिल्याने तेही याला जबाबदार आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला.

संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यामुळे पुकारलेल्या परभणी बंददरम्यान ११ डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा १५ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी २:३५ च्या सुमारास परभणीत नवा मोंढा भागात जाऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची राहुल गांधी यांनी भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादनही केले. 

राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत वाकोडे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कुटुंबीयांच्या भावना ऐकून सांत्वनही केले. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे आदी उपस्थित होते.

हा राजकारण नव्हे, न्याय मिळवून देण्याचा विषय

राहुल म्हणाले, हा कोणतेही राजकारण करण्याचा विषय नाही. हा न्याय मिळवून देण्याचा विषय आहे. या घटनेला संघाची विचारधारा जबाबदार आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन दिले, त्यामुळे याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहिला, ही शंभर टक्के हत्या आहे : राहुल

राहुल म्हणाले की, ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांना मी भेटलो. त्यांनी पोस्टमार्टेम रिपोर्ट दाखविला. छायाचित्रे दाखविली. यातून पोलिसांनी त्यांची हत्या केल्याचे दिसत आहे. ही शंभर टक्के हत्या आहे. मागासवर्गीय असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. याची चौकशी करून संबंधितांना शिक्षा व्हावी.

द्वेष पसरवण्याचा राहुल यांचा उद्देश

राहुल गांधी हे केवळ राजकीय कारणांसाठी महाराष्ट्रात आले. त्यांचा उद्देश लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा आहे. आम्ही सर्व प्रकरणांची तपासणी करीत आहोत. हे प्रकरण न्यायालयात आहे. मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे सिद्ध झाले, तर कोणालाही सोडले जाणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

माझ्या मुलाला मारून पोलिसांनी हाडे मोडली

पोलिसांच्या मारहाणीत माझ्या मुलाची हाडे मोडली. माझ्या मुलाला अटक केली तर त्याची मला माहितीही दिली नव्हती. पोस्टमॉर्टममध्ये सगळे आले तरीही त्याला गंभीर आजार होता, असे चुकीचे सांगत आहेत, अशी व्यथा मृत सोमनाथ यांची आई विजया सूर्यवंशी यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParbhani policeपरभणी पोलीस