शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

बटाट्याचे दर घसरल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST

जिंतूर : यावर्षी बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. मात्र, फेब्रुवारी ...

जिंतूर : यावर्षी बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बटाट्याची आवक वाढल्याने प्रति क्विंटल ६०० ते ११०० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

मागील हंगामात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या बटाट्याची जिंतूर तालुक्यात ५० हेक्टरवर लागवड केली. हवामानातील सततच्या बदलामुळे जोमात असलेली बटाट्याची पिके रोगास बळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधी खरेदी करून फवारणी केली व आपली पिके निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातही आता उत्पादनात घट दिसून येत आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात बटाट्याला अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात हाच दर ६०० ते ११०० रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी व काढणीपर्यंत केलेला खर्च या उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कृषी विभागाकडून मदतीची गरज

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यातच शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल म्हणून जिंतूर तालुक्यात ५० हेक्टरवर बटाट्याची लागवड केली. बाजारात हे बटाटे विक्रीसाठी आल्यानंतर भाव गडगडले आहेत. त्यामुळे या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी कृषी विभाग व राज्य शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील चारठाणा, ब्राह्मणगाव, वरुड, अंबरवाडी, मालेगाव, सोनापूर, जोगवाडा, कान्हा, बेलखेडा, अकोली, लिंबाळा, शेवडी या गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.

‘‘३६०० रुपये प्रति क्विंटल दराने बेणे खरेदी केले होते. आता बाजारात विक्रीसाठी बटाटे आणल्यानंतर ५०० ते ८०० प्रति क्विंटल दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे औषधी, खत, याचाही खर्च निघत नसून उलट मजुरीचा आर्थिक भार वाढला आहे.

-भानुदास घुगे, अंबरवाडी, शेतकरी