शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्याचे दर घसरल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST

जिंतूर : यावर्षी बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. मात्र, फेब्रुवारी ...

जिंतूर : यावर्षी बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बटाट्याची आवक वाढल्याने प्रति क्विंटल ६०० ते ११०० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

मागील हंगामात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या बटाट्याची जिंतूर तालुक्यात ५० हेक्टरवर लागवड केली. हवामानातील सततच्या बदलामुळे जोमात असलेली बटाट्याची पिके रोगास बळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधी खरेदी करून फवारणी केली व आपली पिके निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातही आता उत्पादनात घट दिसून येत आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात बटाट्याला अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात हाच दर ६०० ते ११०० रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी व काढणीपर्यंत केलेला खर्च या उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कृषी विभागाकडून मदतीची गरज

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यातच शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल म्हणून जिंतूर तालुक्यात ५० हेक्टरवर बटाट्याची लागवड केली. बाजारात हे बटाटे विक्रीसाठी आल्यानंतर भाव गडगडले आहेत. त्यामुळे या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी कृषी विभाग व राज्य शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील चारठाणा, ब्राह्मणगाव, वरुड, अंबरवाडी, मालेगाव, सोनापूर, जोगवाडा, कान्हा, बेलखेडा, अकोली, लिंबाळा, शेवडी या गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.

‘‘३६०० रुपये प्रति क्विंटल दराने बेणे खरेदी केले होते. आता बाजारात विक्रीसाठी बटाटे आणल्यानंतर ५०० ते ८०० प्रति क्विंटल दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे औषधी, खत, याचाही खर्च निघत नसून उलट मजुरीचा आर्थिक भार वाढला आहे.

-भानुदास घुगे, अंबरवाडी, शेतकरी