शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

परभणीत १६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:58 IST

जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर १०३ विहिरी अधिग्रहित करुन या विहिरींचे पाणी टंचाईग्रस्त गावासाठी खुले करुन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर १०३ विहिरी अधिग्रहित करुन या विहिरींचे पाणी टंचाईग्रस्त गावासाठी खुले करुन दिले आहे.जिल्ह्यात प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत असतानाच दुसरीकडे टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे. मागील आठवड्यात १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात आता आणखी चार गावांची भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागत आहे. सद्यस्थितीत उपलब्ध झालेल्या माहिती नुसार पूर्णा तालुक्यातील ५ गावांना पाच टँकरद्वारे, पालम तालुक्यातील ३ गावे व २ वाड्यांना ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड तालुक्यात ४ तर जिंतूर तालुक्यात एका गावाला टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने टँकरसह विहिरीचे अधिग्रहण करण्याची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात १०३ विहिरींचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले होते. या सर्व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये सर्वाधिक ४१ विहिरी अधिग्रहित केल्या असून जिंतूर तालुक्यात २१, पालम २० , पूर्णा १७, पाथरी २ आणि मानवत व सेलू तालुक्यात प्रत्येक १ विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. ६२ गावे आणि २३ वाड्यांना अधिग्रहित केलेल्या विहिरींचे पाणी पुरविले जात आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये टंचाई वाढत चालली असून जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. आगामी काळात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी व ग्रामीण भागातील टंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.या गावांमध्ये टँकरचे पाणीपालम तालुक्यात मौजे रामपूर व रामपूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी, पूर्णा तालुक्यात पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई (लासीना), लोण खु., आहेरवाडी, गंगाखेड तालुक्यात खंडाळी, विळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा आणि जिंतूर तालुक्यामध्ये मांडवा येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई