शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शेतीला पाणी देताना येलदरीतून साडेसहा कोटींची वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, ...

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, शेतीच्या सिंचनासाठी दिलेल्या पाण्यातून तब्बल साडेसहा कोटी रुपयांची वीजनिर्मिती केली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील पाणीपुरवठा योजना चालतात. लाखो नागरिकांना पिण्याचे शाश्‍वत पाणी स्रोत असलेल्या येलदरी प्रकल्पामुळे या भागातील जमीन सुपीक झाली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतीसाठी वरदान ठरलेला हा प्रकल्प आता राज्याच्या ऊर्जा विभागासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

येलदरी येथे पाण्याच्या साह्याने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित आहे. २२.५ मेगावॅट प्रतिदिन वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. या प्रकल्पातून सोडलेले पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून वीजनिर्मिती होते.

मागील वर्षी येलदरी प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले. येलदरी प्रकल्पातून रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पहिल्या पाणी आवर्तनातून ७८ लाख ५१ हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या पाणी आवर्तनातून ७५ लाख ४७ हजार आणि सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या पाणी आवर्तनातून ५५ लाख ३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याबरोबरच या प्रकल्पाने ऊर्जानिर्मितीचे काम केले असून, राज्याच्या ऊर्जा खात्यात ६ कोटी ४७ लाख रुपयांची वीज जमा केली आहे.

१४ कोटींपेक्षा अधिक वीजनिर्मिती

गतवर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरला होता. त्यानंतर सलग ७२ दिवस हा प्रकल्प सुरू राहिला आहे. या काळात केलेल्या वीजनिर्मितीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल या प्रकल्पाने जमा केला आहे. १९६१ साली या प्रकल्पाची निर्मिती झाली असून, या प्रकल्पास ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करीत आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २३२ गावांच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. परभणी, नांदेड महापालिकेसह अनेक नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजनाही याच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.