शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला पाणी देताना येलदरीतून साडेसहा कोटींची वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, ...

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, शेतीच्या सिंचनासाठी दिलेल्या पाण्यातून तब्बल साडेसहा कोटी रुपयांची वीजनिर्मिती केली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील पाणीपुरवठा योजना चालतात. लाखो नागरिकांना पिण्याचे शाश्‍वत पाणी स्रोत असलेल्या येलदरी प्रकल्पामुळे या भागातील जमीन सुपीक झाली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतीसाठी वरदान ठरलेला हा प्रकल्प आता राज्याच्या ऊर्जा विभागासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

येलदरी येथे पाण्याच्या साह्याने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित आहे. २२.५ मेगावॅट प्रतिदिन वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. या प्रकल्पातून सोडलेले पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून वीजनिर्मिती होते.

मागील वर्षी येलदरी प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले. येलदरी प्रकल्पातून रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पहिल्या पाणी आवर्तनातून ७८ लाख ५१ हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या पाणी आवर्तनातून ७५ लाख ४७ हजार आणि सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या पाणी आवर्तनातून ५५ लाख ३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याबरोबरच या प्रकल्पाने ऊर्जानिर्मितीचे काम केले असून, राज्याच्या ऊर्जा खात्यात ६ कोटी ४७ लाख रुपयांची वीज जमा केली आहे.

१४ कोटींपेक्षा अधिक वीजनिर्मिती

गतवर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरला होता. त्यानंतर सलग ७२ दिवस हा प्रकल्प सुरू राहिला आहे. या काळात केलेल्या वीजनिर्मितीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल या प्रकल्पाने जमा केला आहे. १९६१ साली या प्रकल्पाची निर्मिती झाली असून, या प्रकल्पास ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करीत आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २३२ गावांच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. परभणी, नांदेड महापालिकेसह अनेक नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजनाही याच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.