शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

शेतीला पाणी देताना येलदरीतून साडेसहा कोटींची वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, ...

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, शेतीच्या सिंचनासाठी दिलेल्या पाण्यातून तब्बल साडेसहा कोटी रुपयांची वीजनिर्मिती केली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील पाणीपुरवठा योजना चालतात. लाखो नागरिकांना पिण्याचे शाश्‍वत पाणी स्रोत असलेल्या येलदरी प्रकल्पामुळे या भागातील जमीन सुपीक झाली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतीसाठी वरदान ठरलेला हा प्रकल्प आता राज्याच्या ऊर्जा विभागासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

येलदरी येथे पाण्याच्या साह्याने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित आहे. २२.५ मेगावॅट प्रतिदिन वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. या प्रकल्पातून सोडलेले पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून वीजनिर्मिती होते.

मागील वर्षी येलदरी प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले. येलदरी प्रकल्पातून रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पहिल्या पाणी आवर्तनातून ७८ लाख ५१ हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या पाणी आवर्तनातून ७५ लाख ४७ हजार आणि सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या पाणी आवर्तनातून ५५ लाख ३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याबरोबरच या प्रकल्पाने ऊर्जानिर्मितीचे काम केले असून, राज्याच्या ऊर्जा खात्यात ६ कोटी ४७ लाख रुपयांची वीज जमा केली आहे.

१४ कोटींपेक्षा अधिक वीजनिर्मिती

गतवर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरला होता. त्यानंतर सलग ७२ दिवस हा प्रकल्प सुरू राहिला आहे. या काळात केलेल्या वीजनिर्मितीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल या प्रकल्पाने जमा केला आहे. १९६१ साली या प्रकल्पाची निर्मिती झाली असून, या प्रकल्पास ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करीत आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २३२ गावांच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. परभणी, नांदेड महापालिकेसह अनेक नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजनाही याच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.