शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गहाळ झालेले मोबाइल पोलिसांच्या प्रयत्नाने परत मिळाले; १८७ तक्रारदारांचे चेहरे खुलले!

By राजन मगरुळकर | Updated: December 16, 2023 16:46 IST

जिल्हा पोलिस दलाने राबविली १४ दिवस विशेष मोहीम 

परभणी : जिल्ह्यातून एक जानेवारीपासून विविध ठिकाणाहून गहाळ झालेले सर्वसामान्य नागरिकांचे मोबाइल शोधण्यास जिल्हा पोलिस दलाने एक ते १४ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविली. यात एकूण ३८ लाखांचे १८७ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले. सदरील सर्व मोबाइल संबंधित तक्रारदार यांना पोलिस मुख्यालयात शुक्रवारी पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातून विविध ठिकाणी गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि सायबर पोलिस, जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांचे अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले. कार्यक्रमास शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डांबळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार, चितांबर कामठेवाड, शरद जऱ्हाड, सहायक पोलिस निरीक्षक वामन बेले यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश कौटकर, बालाजी रेड्डी आणि विविध ठिकाणचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी जुलै आणि सप्टेंबर महिन्यात दोन वेळेला अशाच प्रकारे हस्तगत केलेले मोबाइल संबंधितांना पोलिस ठाणे स्तरावर वितरित केले होते.

या मोहिमेत एक ते १४ डिसेंबरदरम्यान गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ३८ लाखांचे १८७ मोबाइल पोलिसांना सापडले. ही मोहीम परभणी, नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, बीड, हिंगोली, नाशिक, पुणे, अकोला, वाशिम, नगर, बुलढाणा, धाराशिव व तेलंगणा राज्यातील निजामाबाद या भागात राबविण्यात आली. हस्तगत केलेले मोबाइल संबंधित तक्रारदार यांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

१४ पथकात २९ अंमलदारपोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकूण १४ पथके तयार केली. त्यात २९ अंमलदारांची नियुक्ती केली होती. प्रत्येक पोलिस ठाण्यातील दोन अंमलदारांचा यामध्ये सहभाग होता. त्यांनी सदरील ठिकाणी जाऊन हे मोबाइल हस्तगत केले आहेत. पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांनी या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिस अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

तक्रारदारांमध्ये समाधानविविध ठिकाणी गहाळ झालेले मोबाइल थेट तक्रारदार यांना या मोहिमेमध्ये हस्तगत केल्यानंतर त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यापूर्वी दोन मोहिमांत सुद्धा जवळपास २५० हून अधिक मोबाइल वितरित करण्यात आले आहेत. आता या मोहिमेत १८७ मोबाइल परत देण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी