शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परभणीत पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:27 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकºयांच्या हाती उत्पादन लागले नाही़ अशा परिस्थितीतही विमा भरपाईपासून शेतकºयांना वंचित ठेवले जात असल्याने या प्रश्नी सरकारला जाब विचारण्यासाठी दुष्काळ निवारण संघर्ष समितीने मोर्चाचे नियोजन केले होते़ बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील शनिवार बाजार परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला़ नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी कॉ़ राजन क्षीरसागर यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले़फेब्रुवारी २०१८ मधील गारपीटग्रस्त २१२ गावांतील शेतकºयांना रबी पीक विमा अदा करावा, रबी २०१९ मधील ज्वारी व अन्य पिकांचा अग्रीम विमा अदा करावा, दुष्काळग्रस्त गावांना थकीत तूर विमा आणि कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा सरसकट विमा लागू करावा, चुकीच्या उंबरठा उत्पन्नावर आधारित केलेले बोगस पीक कापणी प्रयोग रद्द करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठविण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी