शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पाथरीतील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा; ५० कोटींचा निधी वितरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:40 IST

'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकासासाठी ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे

-विठ्ठल भिसेपाथरी (परभणी ): साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी येथील 'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  ९१ कोटी ८० लाख रुपये निधीस  मान्यता दिली होती. आता शासनाकडून पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांचा विकास आराखडा निधी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांनी १३ फेब्रुवारी रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाथरी  ही साईबाबा यांची जन्मभूमी असून येथे  साईबाबा यांचे भव्य मंदिर उभारणी करण्यात आली आहे. मात्र, साईबाबा तीर्थक्षेत्र विकास कामापासून आजपर्यंत वंचित राहिले. मंदिराकडे जाण्यास साधा रस्ताही नसल्याने साई भक्तांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. २०१६ साली बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी पाथरी येथे भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने साईबाबा जन्मभूमीसाठी विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली. पुढे रामनाथ कोविंद  राष्ट्रपती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगर परिषदकडून विकास आराखडा मागवून घेतला. मात्र, युती शासनाच्या पाच वर्षे काळात आणि त्यानंतर महा विकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षे कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपयांचा आरखड्याची घोषणा केली होती. मात्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीस मुहूर्तच सापडला  नव्हता.

दरम्यान, गतवर्षी राज्यात सत्तांतर झाले शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री  शिंदे यांचे निकटवर्तीय  शिवसेना अल्पसंख्याक  प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाठपुरावा सुरू केला. छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात आली. तद्नंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासनाने  १३ फेब्रुवारी रोजी निधी वितरण बाबत आदेश काढले आहेत. जमिन अधिग्रहण साठी ३९ कोटी रुपये तर ११ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सदरील निधी जिल्हाधिकारी परभणी यांना वर्ग करण्यात आला आहे.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुर करून निधी उपलब्ध करून दिल्याने आता खऱ्या अर्थाने साईभक्ताचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे.कामाचा पाठपुरावा केला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सईद खान यांनी लोकमतला बोलताना दिली.

टॅग्स :saibabaसाईबाबाparabhaniपरभणी