शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

साई जन्मभूमीवर पाथरीकर ठाम; आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेण्याची केली मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:45 IST

महाआरतीनंतर सर्वपक्षीय बैठकीतील सूर

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा.  मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू

पाथरी- साई जन्मभूमीच्या संदर्भात शासनाने आमचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असा सूर पाथरी येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडला. तत्पूर्वी दीड हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री सार्इंची महाआरती करण्यात आली.

श्री साई जन्मभूमी स्थळावरुन शिर्डीकरांनी वाद उपस्थित केल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीतील शिष्टमंळाची बैठक झाली. त्यानंतर पाथरी येथील देवस्थानचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी १२ वाजता पाथरी येथील साई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हाभरातील सुमारे दीड हजारहून अधिक भाविक  उपस्थित होते. या महाआरतीनंतर खा.बंडू जाधव, कृती समितीचे अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.मोहन फड या नेत्यांसह जिल्हाभरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविकांच्या उपस्थितीत पाथरी येथे बैठक सुरु आहे. या बैठकीत शासनाने आमचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय घेऊ नये. जन्मस्थळावर आम्ही ठाम आहोत, असा सूर उमटला. 

यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले, साई जन्मभूमी म्हणूनच शासनाकडे आराखडा दाखल झाला असून त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एखाद्या मुद्यावरुन वाद असेल तर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा. 

आ.सुरेश वरपूडकर म्हणाले, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली. शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा मुद्दा बाजुला ठेवू, असे वक्तव्य केले आहे. त्यावर मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू, असे वरपूडकर म्हणाले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. एकंदर पाथरी येथील साई जन्मस्थळाच्या मुद्यावर सर्वजण ठाम असून जन्मस्थळ म्हणूनच पाथरी येथील साई मंदिराचा विकास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

दरम्यान, विश्वस्त मंडळ आणि सर्वपक्षीय नेते बुधवारी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणीसुद्धा पाथरीकरांनी बैठकीत केली आहे.  अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

टॅग्स :saibabaसाईबाबाpathriपाथरीparabhaniपरभणी