शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

साई जन्मभूमीवर पाथरीकर ठाम; आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेण्याची केली मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:45 IST

महाआरतीनंतर सर्वपक्षीय बैठकीतील सूर

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा.  मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू

पाथरी- साई जन्मभूमीच्या संदर्भात शासनाने आमचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असा सूर पाथरी येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडला. तत्पूर्वी दीड हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री सार्इंची महाआरती करण्यात आली.

श्री साई जन्मभूमी स्थळावरुन शिर्डीकरांनी वाद उपस्थित केल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीतील शिष्टमंळाची बैठक झाली. त्यानंतर पाथरी येथील देवस्थानचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी १२ वाजता पाथरी येथील साई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हाभरातील सुमारे दीड हजारहून अधिक भाविक  उपस्थित होते. या महाआरतीनंतर खा.बंडू जाधव, कृती समितीचे अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.मोहन फड या नेत्यांसह जिल्हाभरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविकांच्या उपस्थितीत पाथरी येथे बैठक सुरु आहे. या बैठकीत शासनाने आमचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय घेऊ नये. जन्मस्थळावर आम्ही ठाम आहोत, असा सूर उमटला. 

यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले, साई जन्मभूमी म्हणूनच शासनाकडे आराखडा दाखल झाला असून त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एखाद्या मुद्यावरुन वाद असेल तर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा. 

आ.सुरेश वरपूडकर म्हणाले, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली. शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा मुद्दा बाजुला ठेवू, असे वक्तव्य केले आहे. त्यावर मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू, असे वरपूडकर म्हणाले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. एकंदर पाथरी येथील साई जन्मस्थळाच्या मुद्यावर सर्वजण ठाम असून जन्मस्थळ म्हणूनच पाथरी येथील साई मंदिराचा विकास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

दरम्यान, विश्वस्त मंडळ आणि सर्वपक्षीय नेते बुधवारी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणीसुद्धा पाथरीकरांनी बैठकीत केली आहे.  अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

टॅग्स :saibabaसाईबाबाpathriपाथरीparabhaniपरभणी