शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा; विमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:10 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सकाळी ११ वाजताच तालुक्यातील शेतकरी मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाली. मार्केटयार्डात उपस्थित शेतकऱ्यांना कृउबा संचालक गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. 

शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते. जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकऱ्यांनाच त्या विम्याचा लाभ देण्यात आला आहे़ उर्वरित शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना देण्यात आले़ 

मोर्चात भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी