शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा; विमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:10 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सकाळी ११ वाजताच तालुक्यातील शेतकरी मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाली. मार्केटयार्डात उपस्थित शेतकऱ्यांना कृउबा संचालक गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. 

शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते. जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकऱ्यांनाच त्या विम्याचा लाभ देण्यात आला आहे़ उर्वरित शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना देण्यात आले़ 

मोर्चात भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी