शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

परभणी जि.प.ची सभा: खोटे गुन्हे मागे घेण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:16 IST

दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कै.बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात जि.प.ची गुरुवारी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सीईओं बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त सीईओं प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर, एस.ई. देसाई, विजय मुळीक, अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे सदस्य श्रीनिवास जोगदंड यांनी दहावीच्या विज्ञान विषयाच्या पेपर फुटीची बातमी छापणाऱ्या पत्रकारांविरोधातच शिक्षण विभागातील अधिकाºयांनी गुन्हे दाखल केल्याचा विषय उपस्थित केला. यावेळी जोगदंड म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी पेपरफुटीची बातमी छापली. या संदर्भात त्यांनी सर्व शाहनिशा केली असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन वृत्तपत्रांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिकाºयांकडून केला गेला, ही बाब चुकीची आहे. त्यामुळे पत्रकारांवरील गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी केली. यावेळी भाजपाचे जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम म्हणाले की, पेपर फुटल्याची माहिती अधिकाºयांना अगोदरच मिळाली होती. या प्रकरणात त्यांनी माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हे दाखल करणे अपेक्षित असताना दिरंगाई केली. उलट शाहनिशा करुन बातम्या छापणाºया पत्रकारांवरच गुन्हे दाखल केल्याची कारवाई चुकीची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असताना वृत्तपत्रांच्या दडपशाहीची भूमिका अधिकारी घेऊन जिल्हा परिषदेची सर्वत्र बदनामी करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्यावेत. यावेळी शिवसेनेचे सदस्य विष्णू मांडे म्हणाले की, पत्रकारांनी पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आणल्यानेच इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. असे असताना चुकीचा प्रकार उघडकीस आणणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची वृत्तीच मूळात चुकीची आहे, असेही मांडे म्हणाले. यावेळी मांडे यांनी पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याचा ठराव मांडला. त्याला डॉ. सुभाष कदम व श्रीनिवास जोगदंड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहात हा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी बोलताना जि.प. सीईओं बी.पी.पृथ्वीराज म्हणाले की, हा विषय वाढविण्याची खरे तर आवश्यकता नव्हती; परंतु, आता या प्रकरणात कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. तसेच पत्रकारांना आरोपही केले जाणार नाही. तर साक्षीदार म्हणून त्यांची या प्रकरणात मदत घेतली जाईल, असे ते म्हणाले.१५ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरीयावेळी अर्थ सभापती अशोक काकडे यांनी जिल्हा परिषदेचा १४ कोटी ८५ लाख २१ हजार रुपयांचा सुधारित व १ लाख ६५ हजार ५९६ रुपयांचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सभागृहाने या अर्थसंकल्पास मंजुरी दिली. या अर्थसंकल्पास समाजकल्याण विभागासाठी १ कोटी ९७ लाख ४१ हजार रुपयांची तरतुद करण्यात आली. याशिवाय अर्थसंकल्पात महिला बालकल्याण विभागासाठी ३६ लाख, कृषी विभागासाठी ५६ लाख १० हजार, पशूसंवर्धन विभागासाठी ५७ लाख, आरोग्य विभागासाठी ५७ लाख, शिक्षण व लघुसिंचन विभागासाठी प्रत्येकी ४० लाख, सामान्य प्रशासनसाठी १ कोटी ११ लाख ७५ हजार, अप्रशासनासाठी ७६ लाख २९ हजार, इमारत व दळणवळणसाठी ४ कोटी ५९ लाख ९३ हजार, अभियांत्रिकीसाठी ४५ लाख व संकीर्णसाठी ३ कोटी ८ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. यावेळी टाकळी बोबडे येथील आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेत अजय चौधरी, समशेर वरपूडकर, राम खराबे, रामराव उबाळे, मीनाताई राऊत, राजेंद्र लहाने, राजेश फड, भरत घनदाट, भगवान सानप, नमिताताई बुधवंत आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :parabhaniपरभणीJournalistपत्रकारnewsबातम्या