शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

परभणी : १३ टक्क्यांनी घटला येलदरीचा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:06 IST

परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले तर भविष्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्यापाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले तर भविष्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परभणीसह शेजारच्या जिल्ह्यांसाठी वरदान ठरले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ८ वर्षापासून या धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे टंचाईची तीव्रता वाढत गेली. मात्र मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला, ही जिल्हावासियांसाठी समाधानाची बाब ठरली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात सिद्धेश्वर धरणही १०० टक्के भरले होते. या धरणातील पाणी कालव्यातून सोडून देण्यात आले. सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी कालव्यातून सोडल्यानंतर आता येलदरी धरणातून दररोज ४.५ दलघमी वीज निर्मिती केंद्रातून सिद्धेश्वर धरणात सोडले जात आहे. या प्रकल्पातून येलदरीचे पाणी नांदेड जिल्ह्यात नेले जात असल्याने जिंतूर तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कुठलेही कारण नसताना सिंचनाच्या नावाखाली येलदरी धरणातील पाणीसाठा कमी केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.७ जानेवारी रोजी या प्रकल्पामध्ये ९९.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ९३४ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात ८०५.५४ दलघमी पाणीसाठा झाला होता. मात्र २३ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पात ७०७.०९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ८७.४० टक्के एवढी आहे. दीड महिन्यातच या प्रकल्पातील ९८ दलघमी पाणी सिद्धेश्वर मार्गाने उचलण्यात आले. याच गतीने पाणी नेल्यास भविष्यात परभणी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते.‘निम्न दुधना’त १०.५० टक्के पाणी४जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे येलदरीसह करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पाबरोबरच गोदावरी नदीवरील बंधाºयातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा मात्र चिंतेचा विषय बनला आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीला २५.४४ दलघमी जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १०.५० टक्के एवढी आहे. त्यामुळे सेलू तालुक्यासह परिसरातील गावांनाही टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी