शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

परभणी : १३ टक्क्यांनी घटला येलदरीचा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:06 IST

परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले तर भविष्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्यापाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले तर भविष्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परभणीसह शेजारच्या जिल्ह्यांसाठी वरदान ठरले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ८ वर्षापासून या धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे टंचाईची तीव्रता वाढत गेली. मात्र मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला, ही जिल्हावासियांसाठी समाधानाची बाब ठरली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात सिद्धेश्वर धरणही १०० टक्के भरले होते. या धरणातील पाणी कालव्यातून सोडून देण्यात आले. सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी कालव्यातून सोडल्यानंतर आता येलदरी धरणातून दररोज ४.५ दलघमी वीज निर्मिती केंद्रातून सिद्धेश्वर धरणात सोडले जात आहे. या प्रकल्पातून येलदरीचे पाणी नांदेड जिल्ह्यात नेले जात असल्याने जिंतूर तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कुठलेही कारण नसताना सिंचनाच्या नावाखाली येलदरी धरणातील पाणीसाठा कमी केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.७ जानेवारी रोजी या प्रकल्पामध्ये ९९.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ९३४ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात ८०५.५४ दलघमी पाणीसाठा झाला होता. मात्र २३ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पात ७०७.०९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ८७.४० टक्के एवढी आहे. दीड महिन्यातच या प्रकल्पातील ९८ दलघमी पाणी सिद्धेश्वर मार्गाने उचलण्यात आले. याच गतीने पाणी नेल्यास भविष्यात परभणी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते.‘निम्न दुधना’त १०.५० टक्के पाणी४जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे येलदरीसह करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पाबरोबरच गोदावरी नदीवरील बंधाºयातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा मात्र चिंतेचा विषय बनला आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीला २५.४४ दलघमी जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १०.५० टक्के एवढी आहे. त्यामुळे सेलू तालुक्यासह परिसरातील गावांनाही टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी