शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परभणी : येलदरी, मासोळी, प्रकल्प तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील येलदरी, मासोळी, करपरा हे प्रकल्प तुडुंब भरले असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही मूबलक पाणीसाठा झाला आहे. गंगाखेड जवळील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथे फक्त ९ टक्केच पाणीसाठा राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील येलदरी, मासोळी, करपरा हे प्रकल्प तुडुंब भरले असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही मूबलक पाणीसाठा झाला आहे. गंगाखेड जवळील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथे फक्त ९ टक्केच पाणीसाठा राहिला आहे.जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. असताना आतापर्यंत ८२७ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. याला निम्न दुधना प्रकल्प अपवाद ठरला आहे. परतीच्या पावसात नेहमीच तुडंूब भरणारा हा प्रकल्प यावर्षी मात्र २० टक्के देखील भरलेला नाही. या प्रकल्पात ७ नोव्हेंबरपर्यंत फक्त १७.४१ टक्के पाणीसाठा होता. विशेष म्हणजे या प्रकल्पानेच गेल्या तीन वर्षात जिल्ह्याला बºयापैकी तारले होते. आता मात्र हा प्रकल्प ३० टक्के तरी भरेल की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे गोदावरील नदीवरील पैठण येथील जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव प्रकल्पातही ८९.८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे पाणी जिल्ह्यासाठी अनेकवेळा वरदान ठरले आहे. त्यास भरीस भर येलदरीची पडली आहे. मराठवाड्यातील मोठया धरणांपैकी एक असलेल्या येलदरी प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडल्याने येलदरी धरणात हे पाणी दाखल झाले. त्यामुळे परभणी शहरासह अनेक शहर व गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न किमान दोन वर्षे तरी मिटला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेला नि:श्वास टाकला आहे. येलदरी व्यतिरिक्त गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गंगाखेड शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्षासाठी सुटला आहे.मानवत तालुक्यातील झरी प्रकल्पातही ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मानवत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पातही ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बोरी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, येलदरी, मासोळी, करपरा, झरी आदी प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा झाला असला तरी सिद्धेश्वर प्रकल्पात १७.६३ टक्के पाणीसाठा आहे. या शिवाय गंगाखेड शहराजवळील मुळी बंधाºयात केवळ ९.४४ टक्के पाणी राहिले आहे. या बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. येथील बंधाºयाला दरवाजे बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात असताना संबंधित विभागाला याकडे पाहण्यास वेळ नाही. गेल्या चार वर्षात समाधानकारक पाऊस नसल्याने हा बंधारा कोरडा होता. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी येथे पाणीसाठा करण्याच्या दृष्टीकोनातून बंधाºयास दरवाजे बसविणे आवश्यक होते; परंतु, त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळाले. परिणामी आता हा बंधाºयातील पाणीसाठा आता तळाला गेला आहे.गतवर्षीच्या : तुलनेत वाढला पाणीसाठा४गतवर्षी येलदरी प्रकल्पात फक्त ८.९१ टक्के पाणी होते. निम्न दुधना प्रकल्पातही गतवर्षी फक्त १७.४१ टक्के तर मासोळी प्रकल्पात २ टक्के पाणी होते. ढालेगाव बंधारा कोरडा होता.४तर मुद्गल बंधाºयात ३९ टक्के आणि डिग्रस बंधाºयात ५२ टक्के पाणी होते. करपरामध्यम प्रकल्पात मात्र गेल्या वर्षी ६२ टक्के आणि झरी येथील प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा होता.डिग्रस, मुद्गल, ढालेगाव बंधाºयात मूबलक पाणी४पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात सद्यस्थितीत ८१.३४० टक्के पाणीसाठा आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाºयात ७३.९३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मुद्गल बंधाºयात ९०.२४० टक्के पाणीसाठा राहिला आहे. या तिन्ही बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने परिसरातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प