शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

परभणी : उच्च दाब योजनेतील कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:52 IST

पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५ महिन्यात ३ हजार कृषीपंपधारकांना वीज जोडणी देण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५ महिन्यात ३ हजार कृषीपंपधारकांना वीज जोडणी देण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंपधारकांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनतून वीज कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंत्री मंडळाची मान्यताही घेतली. ज्या शेतकºयानी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत, अशा ३ हजार ६६३ शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. २ शेतकºयांना १ किंवा एका शेतकºयाला एक रोहित्र या योजनेतून दिले जाणार आहे. यासाठी परभणी जिल्ह्याला ८६ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले. त्यानुसार वीज वितरण कंपनीला पैसेही प्राप्त झाले. सप्टेंबर २०१८ मध्ये या कामासाठी संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभ आदेशही देण्यात आला. शेतकºयांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेतून प्रत्येक लाभार्थी शेतकºयांच्या शेतामध्ये स्वतंत्र विद्युत रोहित्र उभे राहील, अशी अपेक्षा कृषीपंपधारक उराशी बाळगून आहेत; परंतु, या योजनेंतर्गत कामे करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. कार्यारंभ आदेश देऊन १० महिन्यांचा कालावधी उलटला आहे; परंतु, ३ हजार ६६३ कृषीपंपधारक शेतकºयांपैकी केवळ ५५८ शेतकºयांनाच या योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९ ची मुदत आहे; परंतु, संबंधित कंत्राटदारांची कामाची गती पाहता उर्वरित पाच महिन्यामध्ये जवळपास ३ हजार कृषीपंपधारक शेतकºयांना उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत स्वतंत्र विद्युत रोहित देण्याचे काम पूर्ण होईल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीने पुढाकार घेत कंत्राटदारांकडून कामे करुन घ्यावीत, अशी अपेक्षा लाभार्थ्यांतून व्यक्त केली जात आहे.दहा महिन्यानंतरही : मानवत, पाथरी निरंकच४उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ८६ कोटी रुपये मंजूर करुन या निधीतून ३ हजार ६६३ शेतकºयांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु, या योजनेअंतर्गत कामाचा कार्यारंभ आदेश देऊन १० महिने उलटले आहेत; परंतु, अद्यापही मानवत आणि पाथरी विभागात एकही काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.४सोनपेठ विभागासाठी २११ कृषीपंपधारकांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत.४ सेलू विभागासाठी ५२५ चे उद्दिष्ट देण्यात आले असून ३७ कामे पूर्ण झाले आहेत. पालम विभागासाठी ३०१ चे उद्दिष्ट असून २० कामे पूर्ण झाली आहेत. जिंतूर विभागासाठी १०९८ चे उद्दिष्ट असून १४२ कामे पूर्ण झाली आहेत.४गंगाखेड विभागात ३३८ कृषीपंपधारकांना लाभ मिळणार असून १० महिने उलटले तरी केवळ ६३ शेतकºयांनाच लाभ मिळाला आहे. पूर्णा विभागासाठी ४०० शेतकºयांचे उद्दिष्ट असून ६४ शेतकºयांची कामे पूर्ण झाली आहेत.४आघाडीवर परभणी विभाग असून या विभागात ५५२ शेतकºयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १८२ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे.४तर मानवत विभागासाठी २३८ व पाथरी विभागासाठी ३०० कृषीपंप वीज जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ;परंतु, अद्यापही एकही काम पूर्ण झाले नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे करुन घेण्यासाठी कंपनीने पुढकार घ्यावा.कामाबाबत जिल्हा प्रशासनाकङे तक्रारी४कृषीपंपधारकाला स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळावे, यासाठी वीज वितरण कंपनीने उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८६ कोटी रुपयांची कामे सुरु आहेत; परंतु, ही कामे देताना कंत्राटदार वेगळा व प्रत्यक्ष कामे करणारे दुसरेच असल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत आहे.४त्याच बरोबर जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील काही लाभधारकांनी या योजनेच्या कामाबाबत लोकशाही दिनामध्ये तक्रारीही केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन कामाबाबतचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण