शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

परभणी : उच्च दाब योजनेतील कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:52 IST

पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५ महिन्यात ३ हजार कृषीपंपधारकांना वीज जोडणी देण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५ महिन्यात ३ हजार कृषीपंपधारकांना वीज जोडणी देण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंपधारकांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनतून वीज कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंत्री मंडळाची मान्यताही घेतली. ज्या शेतकºयानी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत, अशा ३ हजार ६६३ शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. २ शेतकºयांना १ किंवा एका शेतकºयाला एक रोहित्र या योजनेतून दिले जाणार आहे. यासाठी परभणी जिल्ह्याला ८६ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले. त्यानुसार वीज वितरण कंपनीला पैसेही प्राप्त झाले. सप्टेंबर २०१८ मध्ये या कामासाठी संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभ आदेशही देण्यात आला. शेतकºयांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेतून प्रत्येक लाभार्थी शेतकºयांच्या शेतामध्ये स्वतंत्र विद्युत रोहित्र उभे राहील, अशी अपेक्षा कृषीपंपधारक उराशी बाळगून आहेत; परंतु, या योजनेंतर्गत कामे करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. कार्यारंभ आदेश देऊन १० महिन्यांचा कालावधी उलटला आहे; परंतु, ३ हजार ६६३ कृषीपंपधारक शेतकºयांपैकी केवळ ५५८ शेतकºयांनाच या योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९ ची मुदत आहे; परंतु, संबंधित कंत्राटदारांची कामाची गती पाहता उर्वरित पाच महिन्यामध्ये जवळपास ३ हजार कृषीपंपधारक शेतकºयांना उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत स्वतंत्र विद्युत रोहित देण्याचे काम पूर्ण होईल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीने पुढाकार घेत कंत्राटदारांकडून कामे करुन घ्यावीत, अशी अपेक्षा लाभार्थ्यांतून व्यक्त केली जात आहे.दहा महिन्यानंतरही : मानवत, पाथरी निरंकच४उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ८६ कोटी रुपये मंजूर करुन या निधीतून ३ हजार ६६३ शेतकºयांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु, या योजनेअंतर्गत कामाचा कार्यारंभ आदेश देऊन १० महिने उलटले आहेत; परंतु, अद्यापही मानवत आणि पाथरी विभागात एकही काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.४सोनपेठ विभागासाठी २११ कृषीपंपधारकांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत.४ सेलू विभागासाठी ५२५ चे उद्दिष्ट देण्यात आले असून ३७ कामे पूर्ण झाले आहेत. पालम विभागासाठी ३०१ चे उद्दिष्ट असून २० कामे पूर्ण झाली आहेत. जिंतूर विभागासाठी १०९८ चे उद्दिष्ट असून १४२ कामे पूर्ण झाली आहेत.४गंगाखेड विभागात ३३८ कृषीपंपधारकांना लाभ मिळणार असून १० महिने उलटले तरी केवळ ६३ शेतकºयांनाच लाभ मिळाला आहे. पूर्णा विभागासाठी ४०० शेतकºयांचे उद्दिष्ट असून ६४ शेतकºयांची कामे पूर्ण झाली आहेत.४आघाडीवर परभणी विभाग असून या विभागात ५५२ शेतकºयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १८२ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे.४तर मानवत विभागासाठी २३८ व पाथरी विभागासाठी ३०० कृषीपंप वीज जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ;परंतु, अद्यापही एकही काम पूर्ण झाले नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे करुन घेण्यासाठी कंपनीने पुढकार घ्यावा.कामाबाबत जिल्हा प्रशासनाकङे तक्रारी४कृषीपंपधारकाला स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळावे, यासाठी वीज वितरण कंपनीने उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८६ कोटी रुपयांची कामे सुरु आहेत; परंतु, ही कामे देताना कंत्राटदार वेगळा व प्रत्यक्ष कामे करणारे दुसरेच असल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत आहे.४त्याच बरोबर जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील काही लाभधारकांनी या योजनेच्या कामाबाबत लोकशाही दिनामध्ये तक्रारीही केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन कामाबाबतचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण