शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘रोजगार हमी’तून होणार ३५२० विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:46 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचातींमध्ये प्रत्येकी ५ विहिरींची कामे सुरु करण्याचे आदेश ५ जानेवारी रोजी नियोजन विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ३ हजार ५२० विहिरींची कामे सुरु होणार असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचातींमध्ये प्रत्येकी ५ विहिरींची कामे सुरु करण्याचे आदेश ५ जानेवारी रोजी नियोजन विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ३ हजार ५२० विहिरींची कामे सुरु होणार असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २००८ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. मात्र मागील काही वर्षांपासून या योजनेत गैरप्रकार वाढल्याने तसेच योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने या योजनेतील वैयक्तिक लाभाची कामे बाजुला करुन समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरु करण्यात आली. या योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी वेळापत्रकही ठरवून देण्यात आले होते. मात्र मनरेगा प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ही समृद्ध योजनाही जिल्ह्यामध्ये यशस्वी झाली नाही.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप हंगामात हजारो रुपयांचा खर्च करुन पेरणी केली; परंतु, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे शेतकरी व शेतीवर अवलंबून असलेला मजूर वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. आगामी जूनपर्यंत आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत हे मजूर सापडले आहेत. त्यातच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गावात काम उपलब्ध होईल, यासाठी जानेवारी २०१९ पर्यंत वाट पाहत असलेले मजूर व शेतकरी रोजगाराच्या शोधार्थ उपनगरांकडे धाव घेत आहेत; परंतु, उदासिनतेची चादर ओढणारे जिल्ह्यातील मनरेगा प्रशासन मात्र जिल्ह्यात शेततळे, विहीर, रस्त्यांची कामे सुरु करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सध्याची दुष्काळी परिस्थिती विचारात घेता व मजुरांचे रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ५ जानेवारी रोजी रोहयो विभागासाठी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ विहिरींची कामे सुरु करावीत, असे नमूद केले आहे. त्यामुळे या परिपत्रकाची काटेकोरपणे व वेळेत मनरेगा विभागाने अंमलबजावणी केली तर जिल्ह्यातील मजूर वर्गाला दुष्काळी परिस्थितील मोठा दिलासा मिळणार आहे. त्या दृष्टिकोणातून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे मनरेगा प्रशासनाने जिल्ह्यात सिंचन विहिरींची कामे सुरु करुन रोजगाराच्या शोधात असलेल्या मजुरांना व लाभार्थी शेतकºयांना या परिपत्रकाचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात केवळ १४० विहिरींची कामे सुरुमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सहभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमआयएसनुसार मनरेगा योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत केवळ १४० विहिरींची कामे सुरु असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गंगाखेड, परभणी, सेलू व सोनपेठ तालुक्यात अद्यापपर्यंत एकाही सिंचन विहिरीच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही. तर मानवत तालुक्यात २०, जिंतूरमध्ये ३, पालम १, पाथरी मध्ये १७ तर सर्वाधिक पूर्णा तालुक्यात ९९ सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. त्यामुळे नियोजन विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात सिंचन विहिरींची कामे सुरु केली तर ३ हजार ५२० कामांना सुरुवात होणार असून लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार