शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका
2
नरेंद्र मोदी आज घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; राज्यातून १२ जणांची मंत्रिपदासाठी चर्चा
3
WI vs Uganda : 39 ALL OUT! 'अकेला' हुसैन! नवख्या संघाला स्वस्तात गुंडाळलं; विडिंजचा मोठा विजय 
4
‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर
5
खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर
6
ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध
7
शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका
8
एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले
9
आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!
10
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दोनशेपार, गतविजेत्या इंग्लंडची झाली हार! ॲडम झम्पाचा प्रहार
11
४ चौकार अन् १४ षटकार! अभिषेक शर्माचा सुपर शो कायम; २५ चेंडूत झळकावले शतक
12
राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत
13
लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता
14
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल
15
लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव
16
जा, गपचूप बॅटींग कर! अम्पायर नितीन मेनन यांनी भरला मॅथ्यू वेडला दम, Video Viral 
17
रशियात बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले, अमळनेरच्या भाऊ-बहिणीला शोधण्यात ‘माॅस्को’च्या पथकाला यश
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावा, १४ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम 
19
पाकिस्तानच्या आफ्रिदीनं बुमराहच्या 'लेका'ला काय दिलं होतं खास गिफ्ट? संजनानं केला खुलासा
20
जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा

परभणी शहरी भागाची लोटामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:56 PM

स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़केंद्र आणि राज्य शासनाने मागील काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे़ या अभियानांतर्गत शहरातील त्याचबरोबर ग्रामीण भागातील स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे़ हगणदारीमुक्त गावे जाहीर करण्याबरोबरच सर्व नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे़ स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधकाम हा महत्त्वपूर्ण घटक आहे़ या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाला दरवर्षी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले जाते़ शहरी भागात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ शहरातील सार्वजनिक हागणदारीची स्थळे निष्काशीत करण्यात आली आहेत़ त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी शौचालयांचे बांधकामही करण्यात आले आहे़ त्यामुळे शहरी भागामध्ये हे अभियान बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसत आहे़ शौचालयाच्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने प्रोत्साहन अनुदान दिले जात असले तरी शौचलयाचे बांधकाम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात नागरिकांमध्ये उदासिनता दिसून आली़ परंतु, दरवर्षी या संदर्भाने जनजागृती केली जात असून, त्यात आता नागरिकांची मानसिकता बदलत असल्याचे दिसत आहे़ परभणी महानगरपालिका वगळता ७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील शौचालय बांधकामांचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच शहरांमध्ये वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील सहा शहरांनी २०१९-२० मध्ये दिलेले वैयक्तीक शौचालय बांधकामाची उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ या आठही शहरांसाठी यावर्षी २० हजार ७५२ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी २० हजार ८४ शौचालये बांधून त्यांचा वापरही सुरू झाला आहे़ जवळपास ९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शहरी भागाची वाटचाल लोटामुक्तीकडे होत आहे़ पाथरी नगरपालिकने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ पाथरी शहरात २ हजार ६७७ शौचालये यावर्षभरात बांधण्यात आली़ त्याचप्रमाणे गंगाखेड ३ हजार ७५, सेलू ३ हजार ३४०, मानवत ३ हजार १५५, सोनपेठ १ हजार ८८२ आणि जिंतूर नगरपालिकेने १ हजार ९४१ शौचालये यावर्षभरात बांधून पूर्ण केली असून, या सर्व शहरांनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने या शहरांची वाटचाल लोटामुक्तीकडे झाली आहे़ त्यामुळे शहरी भागात शौचालय वगळून इतर सार्वजनिक स्वच्छता, घनकचºयाचे व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती या बाबीवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे़दोनशहरांचे उद्दिष्ट अपूर्णशहरी भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामात पालम आणि पूर्णा ही दोन्ही शहरे मागे पडली आहेत़ पालम शहरात १ हजार ७४३ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होत़े त्या तुलनेत १ हजार ३५४ शौचालयांचे आतापर्यंत बांधकाम झाले आहे़पूर्णा शहरातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे़ पूर्णा नगरपालिकेने २ हजार ८५० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते़ पालिकेने २ हजार ६६० वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण केली आहेत़या दोन्ही शहरांमध्ये शौचालय बांधकामासाठी आणखी चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे़ या काळात वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करून ही शहरेही लोटामुक्तीकडे वाटचाल करू शकतात़४शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज ग्रामीण भागामध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले जात असून, शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.४त्याचप्रमाणे ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन वापर सुरू केला आहे, अशा ग्रामस्थांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.अभियान : ग्रामीण भागात आव्हान४पाच वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी ग्रामीण भागात अद्यापही या संदर्भात उदासिनता दिसून येत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भाग लोटामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ हजार ३८३ शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़४त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५२९, जिंतूर ४ हजार ८५९, मानवत १ हजार ९९०, पालम ३ हजार ५७८, परभणी ५ हजार ४००, पाथरी १ हजार ५२१, पूर्णा ५ हजार २४१, सेलू ४ हजार २२ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १ हजार २४३ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित कण्यात आले आहे़ त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ७ हजार ५७१ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़४ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले, अशा ५ हजार ८४७ ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या वतीने १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामाची गती लक्षात घेता या भागात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करून शौचालय बांधकामे वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार