शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना पुढाकार घेतला होता. त्यामुळे कर्ज वाटपाची टक्केवारी १०२ टक्क्यांपर्यंत गेली होती; परंतु, २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकांतून उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना बँका दुष्काळी परिस्थितीत पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून आर्थिक मदत करतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी राज्य शासनाने ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यामध्येही जिल्ह्यातील वाणिज्य बँकांनी १२ हजार २२ शेतकºयांना १२१ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी ९०३ शेतकºयांना १५ कोटी ३ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार ६८३ शेतकºयांना २७ कोटी २३ लाख, जिल्ंहा मध्यवर्ती बँकेने ५ हजार ६२५ शेतकºयांना १५ कोटी ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांची परिस्थिती लक्षात न घेता जिल्ह्यातील २२ हजार ३२३ शेतकºयांना केवळ १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.त्यामुळे गतवर्षी जिल्ह्याचा पीक कर्ज वाटपाचा आलेख यावर्षी मात्र केवळ ५० टक्यावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे बँकांनी पीक कर्ज वाटप करताना घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत ढकलणाराच दिसून येत आहे.खरीप : हंगामही ३० टक्क्यांवर४जिल्ह्यातील बँकांनी यावर्षी खरीप पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटप करताना आखडा हात घेतल्याचे दिसून येत आहे.४२०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंमागासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्याची टक्केवारी केवळ ३०.५ टक्के आहे.४त्यामुळे बँकांनी खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक