शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना पुढाकार घेतला होता. त्यामुळे कर्ज वाटपाची टक्केवारी १०२ टक्क्यांपर्यंत गेली होती; परंतु, २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकांतून उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना बँका दुष्काळी परिस्थितीत पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून आर्थिक मदत करतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी राज्य शासनाने ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यामध्येही जिल्ह्यातील वाणिज्य बँकांनी १२ हजार २२ शेतकºयांना १२१ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी ९०३ शेतकºयांना १५ कोटी ३ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार ६८३ शेतकºयांना २७ कोटी २३ लाख, जिल्ंहा मध्यवर्ती बँकेने ५ हजार ६२५ शेतकºयांना १५ कोटी ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांची परिस्थिती लक्षात न घेता जिल्ह्यातील २२ हजार ३२३ शेतकºयांना केवळ १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.त्यामुळे गतवर्षी जिल्ह्याचा पीक कर्ज वाटपाचा आलेख यावर्षी मात्र केवळ ५० टक्यावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे बँकांनी पीक कर्ज वाटप करताना घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत ढकलणाराच दिसून येत आहे.खरीप : हंगामही ३० टक्क्यांवर४जिल्ह्यातील बँकांनी यावर्षी खरीप पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटप करताना आखडा हात घेतल्याचे दिसून येत आहे.४२०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंमागासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्याची टक्केवारी केवळ ३०.५ टक्के आहे.४त्यामुळे बँकांनी खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक