शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:03 IST

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परभणी जिल्ह्यात गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे जिंतूर, सेलू आणि परभणी या तालुक्यांचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे परभणीत मुक्कामी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासप्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून ठोस घोषणा होईल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि आरोग्याच्या संदर्भाने जिल्हा अविकसित आहे़ या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत़ जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी तसेच गंभीर आजारावरील उपचार जिल्ह्यातच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली जात आहे़ यासाठी जिल्हाभरात जनआंदोलनही उभे राहिले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली खरी़ मात्र त्या पुढे कुठलीही हालचाल झाली नाही़ वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जागेची निश्चिती, महाविद्यालयातील पदनिर्मिती यासह प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया संथगतीने आहे़ त्यामुळे या प्रश्नाला चालना देण्यासाठी कालमर्यादा ठेऊन ठोस घोषणा करणे अपेक्षित आहे़ तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी परभणी शहरालगत नवीन एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रश्नही रखडलेला आहे़ बोरवंड परिसरात एमआयडीसीसाठी जमीन अधिगृहित करण्याचे कामही अद्याप झाले नाही़ शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा निश्चित नसल्याने हा प्रश्न रखडला आहे़त्यामुळे मावेजाची घोषणा करून एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहित करून प्रत्यक्ष एमआयडीसी उभारणीला सुरुवात केली तर जिल्ह्यातील रोजगाराचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो; परंतु, राजकीय उदासिनतेमुळे केवळ घोषणाच झाल्या असून, घोषणा झालेले प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने जिल्ह्याचा विकासही संथगतीने होत आहे़ याशिवाय सिंचनासाठी भरीव निधी विजेच्या समस्या, कृषीप्रधान उद्योगांना चालना देणे या प्रश्नांबरोबरच शेतकºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़मागील घोषणाचीही संथ अंमलबजावणी४जिल्ह्यात रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत़ गंगाखेड रस्त्याचा प्रश्न तर येथील खड्ड्यामुळे राज्यभरात गाजला होता़ मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते़ त्यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते अनेक रस्त्यांच्या कामांचे ई-उद्घाटन करण्यात आले़ गंगाखेड आणि जिंतूर रस्त्यांचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली़४त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे जिल्ह्यात सुरू होत असल्याचे सांगितले़ प्रत्यक्षात उद्घाटनानंतर प्रमुख रस्त्यांची कामेच अतिशय संथगतीने होत आहेत़ वर्षभरापासून गंगाखेड आणि जिंतूर रस्ता खोदून ठेवला असून, काम अद्याप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे मुख्यमंत्री या प्रश्नांतही लक्ष घालतील, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस