शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:03 IST

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परभणी जिल्ह्यात गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे जिंतूर, सेलू आणि परभणी या तालुक्यांचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे परभणीत मुक्कामी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासप्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून ठोस घोषणा होईल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि आरोग्याच्या संदर्भाने जिल्हा अविकसित आहे़ या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत़ जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी तसेच गंभीर आजारावरील उपचार जिल्ह्यातच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली जात आहे़ यासाठी जिल्हाभरात जनआंदोलनही उभे राहिले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली खरी़ मात्र त्या पुढे कुठलीही हालचाल झाली नाही़ वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जागेची निश्चिती, महाविद्यालयातील पदनिर्मिती यासह प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया संथगतीने आहे़ त्यामुळे या प्रश्नाला चालना देण्यासाठी कालमर्यादा ठेऊन ठोस घोषणा करणे अपेक्षित आहे़ तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी परभणी शहरालगत नवीन एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रश्नही रखडलेला आहे़ बोरवंड परिसरात एमआयडीसीसाठी जमीन अधिगृहित करण्याचे कामही अद्याप झाले नाही़ शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा निश्चित नसल्याने हा प्रश्न रखडला आहे़त्यामुळे मावेजाची घोषणा करून एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहित करून प्रत्यक्ष एमआयडीसी उभारणीला सुरुवात केली तर जिल्ह्यातील रोजगाराचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो; परंतु, राजकीय उदासिनतेमुळे केवळ घोषणाच झाल्या असून, घोषणा झालेले प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने जिल्ह्याचा विकासही संथगतीने होत आहे़ याशिवाय सिंचनासाठी भरीव निधी विजेच्या समस्या, कृषीप्रधान उद्योगांना चालना देणे या प्रश्नांबरोबरच शेतकºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़मागील घोषणाचीही संथ अंमलबजावणी४जिल्ह्यात रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत़ गंगाखेड रस्त्याचा प्रश्न तर येथील खड्ड्यामुळे राज्यभरात गाजला होता़ मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते़ त्यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते अनेक रस्त्यांच्या कामांचे ई-उद्घाटन करण्यात आले़ गंगाखेड आणि जिंतूर रस्त्यांचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली़४त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे जिल्ह्यात सुरू होत असल्याचे सांगितले़ प्रत्यक्षात उद्घाटनानंतर प्रमुख रस्त्यांची कामेच अतिशय संथगतीने होत आहेत़ वर्षभरापासून गंगाखेड आणि जिंतूर रस्ता खोदून ठेवला असून, काम अद्याप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे मुख्यमंत्री या प्रश्नांतही लक्ष घालतील, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस