शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:03 IST

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परभणी जिल्ह्यात गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे जिंतूर, सेलू आणि परभणी या तालुक्यांचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे परभणीत मुक्कामी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासप्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून ठोस घोषणा होईल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि आरोग्याच्या संदर्भाने जिल्हा अविकसित आहे़ या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत़ जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी तसेच गंभीर आजारावरील उपचार जिल्ह्यातच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली जात आहे़ यासाठी जिल्हाभरात जनआंदोलनही उभे राहिले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली खरी़ मात्र त्या पुढे कुठलीही हालचाल झाली नाही़ वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जागेची निश्चिती, महाविद्यालयातील पदनिर्मिती यासह प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया संथगतीने आहे़ त्यामुळे या प्रश्नाला चालना देण्यासाठी कालमर्यादा ठेऊन ठोस घोषणा करणे अपेक्षित आहे़ तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी परभणी शहरालगत नवीन एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रश्नही रखडलेला आहे़ बोरवंड परिसरात एमआयडीसीसाठी जमीन अधिगृहित करण्याचे कामही अद्याप झाले नाही़ शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा निश्चित नसल्याने हा प्रश्न रखडला आहे़त्यामुळे मावेजाची घोषणा करून एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहित करून प्रत्यक्ष एमआयडीसी उभारणीला सुरुवात केली तर जिल्ह्यातील रोजगाराचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो; परंतु, राजकीय उदासिनतेमुळे केवळ घोषणाच झाल्या असून, घोषणा झालेले प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने जिल्ह्याचा विकासही संथगतीने होत आहे़ याशिवाय सिंचनासाठी भरीव निधी विजेच्या समस्या, कृषीप्रधान उद्योगांना चालना देणे या प्रश्नांबरोबरच शेतकºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़मागील घोषणाचीही संथ अंमलबजावणी४जिल्ह्यात रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत़ गंगाखेड रस्त्याचा प्रश्न तर येथील खड्ड्यामुळे राज्यभरात गाजला होता़ मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते़ त्यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते अनेक रस्त्यांच्या कामांचे ई-उद्घाटन करण्यात आले़ गंगाखेड आणि जिंतूर रस्त्यांचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली़४त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे जिल्ह्यात सुरू होत असल्याचे सांगितले़ प्रत्यक्षात उद्घाटनानंतर प्रमुख रस्त्यांची कामेच अतिशय संथगतीने होत आहेत़ वर्षभरापासून गंगाखेड आणि जिंतूर रस्ता खोदून ठेवला असून, काम अद्याप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे मुख्यमंत्री या प्रश्नांतही लक्ष घालतील, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस