शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

परभणी : जलयुक्त शिवार बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:21 IST

प्रसाद आर्वीकर । लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : चालू आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेला एक रुपयाचीही आर्थिक तरतूद झाली ...

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालू आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेला एक रुपयाचीही आर्थिक तरतूद झाली नसल्याने ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.राज्यातील दुष्काळ कायमचा हटविण्याच्या उद्देशाने भाजपासरकारने पाच वर्षांपूर्वी विविध विभागांचा अंतर्भाव करीत जलयुक्त शिवार ही योजना राबविली. या योजनेचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यात भाजप शासनाच्या काळातच योजनेकडे पाठ फिरविण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी आराखडाही तयार केला नाही आणि शासनानेही निधीही दिला नाही. पुढे विधानसभा निवडणुका होऊन राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून आता ही योजना पुढे सुरु राहण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे जुनी कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार योजना बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जुन्या कामांसाठी मागितली मुदतवाढ४मागील वर्षी परभणी जिल्ह्याला जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी ३३ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. वर्षभरात या योजनेवर २४ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित ९ कोटी २२ लाख रुपये शासनाला परत केले होते. मात्र या योजनेंतर्गत अनेक कामे पूर्ण होणे बाकी आहे.४यावर्षी आॅक्टोबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस बरसला. त्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. डिसेंबर महिन्यात योजनेची मुदत संपणार आहे. शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मे २०२० पर्यंतची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. त्यामुळे या कामांना मुदतवाढ मिळते की नाही, याकडेही लक्ष लागले आहे.‘जलयुक्त’ची ३२२ कामे ठप्पच४एकीकडे जलयुक्त शिवार ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे या योजनेंतर्गत मागील वर्षीची तब्बल ३२२ कामे अजूनही सुरु झाली नाहीत. त्यामुळे ही कामे सुरु कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेत कृषी विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक विभाग, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग, जालना येथील जलसंपदा विभाग, विभागीय वन अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली होती.४त्यात २०१८-१९ या वर्षामधील कृषी विभागाची २२०, लघु पाटबंधारे विभागाची ३४ आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची विहीर पूनर्भरण, गाळ काढण्याची ६६ कामे अद्यापही सुरु झाली नाहीत. त्यामुळे या कामांना कधी मुहूर्त लागतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पBJPभाजपाGovernmentसरकार