शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

परभणी : जलयुक्त शिवार बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:21 IST

प्रसाद आर्वीकर । लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : चालू आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेला एक रुपयाचीही आर्थिक तरतूद झाली ...

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालू आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेला एक रुपयाचीही आर्थिक तरतूद झाली नसल्याने ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.राज्यातील दुष्काळ कायमचा हटविण्याच्या उद्देशाने भाजपासरकारने पाच वर्षांपूर्वी विविध विभागांचा अंतर्भाव करीत जलयुक्त शिवार ही योजना राबविली. या योजनेचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यात भाजप शासनाच्या काळातच योजनेकडे पाठ फिरविण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी आराखडाही तयार केला नाही आणि शासनानेही निधीही दिला नाही. पुढे विधानसभा निवडणुका होऊन राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून आता ही योजना पुढे सुरु राहण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे जुनी कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार योजना बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जुन्या कामांसाठी मागितली मुदतवाढ४मागील वर्षी परभणी जिल्ह्याला जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी ३३ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. वर्षभरात या योजनेवर २४ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित ९ कोटी २२ लाख रुपये शासनाला परत केले होते. मात्र या योजनेंतर्गत अनेक कामे पूर्ण होणे बाकी आहे.४यावर्षी आॅक्टोबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस बरसला. त्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. डिसेंबर महिन्यात योजनेची मुदत संपणार आहे. शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मे २०२० पर्यंतची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. त्यामुळे या कामांना मुदतवाढ मिळते की नाही, याकडेही लक्ष लागले आहे.‘जलयुक्त’ची ३२२ कामे ठप्पच४एकीकडे जलयुक्त शिवार ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे या योजनेंतर्गत मागील वर्षीची तब्बल ३२२ कामे अजूनही सुरु झाली नाहीत. त्यामुळे ही कामे सुरु कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेत कृषी विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक विभाग, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग, जालना येथील जलसंपदा विभाग, विभागीय वन अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली होती.४त्यात २०१८-१९ या वर्षामधील कृषी विभागाची २२०, लघु पाटबंधारे विभागाची ३४ आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची विहीर पूनर्भरण, गाळ काढण्याची ६६ कामे अद्यापही सुरु झाली नाहीत. त्यामुळे या कामांना कधी मुहूर्त लागतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पBJPभाजपाGovernmentसरकार