शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परभणी:जलवाहिनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:57 IST

झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथील दोघांवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथील दोघांवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मानवत तालुक्यातील झरी येथील लघू तलावातील उपलब्ध पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठा विभागाने शेतकऱ्यांना सूचना देऊन विद्युत मोटारी काढण्याचे आवाहन करूनही काही शेतकºयांनी पाणी उपसा सुरुच ठेवला होता. यामुळे मागील आठवड्यात नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत दोन शेतकºयांच्या विद्युत मोटारी जप्त केल्या. त्याच बरोबर १५ मे रोजी प्रशासनाने पुन्हा कारवाई करीत अजून दोन मोटारी जप्त केल्या. प्रशासनाने केलेल्या कारवाईचा राग मनात धरून विनायक सत्वधर व विलास सत्वधर यांनी मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दोन ठिकाणी फोडल्याची तक्रार पाणीपुरवठा अधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली. याच तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, १७ मे रोजी सकाळी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी फोडलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी गेले होेते. यावेळी एका ठिकाणी दुरुस्ती केल्यानंतर अन्य एका ठिकाणी पाईपलाईन फोडल्याचे आढळून आले. फोडलेल्या पाईपलाईनमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो. या प्रकारामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला परिणाम४झरी येथील तलावातून मानवत शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या तलावात एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पालिकेकडून तलावातून पाण्याचा अवैध उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. कारवाईचा राग मनात धरून झरी येथून आलेली जलवाहिनी दोन ठिकाणी फोडण्यात आली. त्याचबरोबर खोडसाळपणे काही जण विद्युत पुरवठाही बंद करीत आहेत. त्याचबरोबर पालिकेने हाती घेतलेल्या एक्सप्रेस फिडरचे कामही काही जणांनी अडथळा आणून बंद पाडले होते. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :PachoraपाचोराparabhaniपरभणीWaterपाणी