शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

परभणी: ६० हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:08 IST

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़यावर्षी जिल्ह्यात टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ भूजल पातळी १२ मीटरने खोल गेली असून, प्रकल्पांमध्येही पाणीसाठी शिल्लक नाही़ परिणामी ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता वाढली आहे़ शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना प्रकल्पातील पाणी राखीव ठेवले असल्याने थोड्याफार प्रमाणात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र अशा प्रकारचे नियोजन नसल्याने हा भाग टंचाईने होरपळत आहे़ सद्यस्थितीला ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत़ नळाला पाणी येत नाही़ गावातील विहिरी, बोअर आटले आहेत़ परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ काही भागात शेत शिवारातून पाणी उपलब्ध केले जात असले तरी प्रत्येक गावात पाणी मिळणे शक्य नाही़ परिणामी प्रशासनाने टँकर सुरू केले आहे़सद्यस्थितीला पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, सेलू आणि जिंतूर या सहा तालुक्यांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़पालम तालुक्यात २२ हजार ८४० ग्रामस्थांना १६ टँकरच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ पूर्णा तालुक्यातील पाच गावांमध्ये ९ हजार ७०७ ग्रामस्थांना ८ टँकरच्या सहाय्याने, गंगाखेड तालुक्यातील ३ गावांतील ३ हजार ४१७ ग्रामस्थांना ३ टँकरच्या सहाय्याने, सोनपेठ तालुक्यातील २ गावांमधील ६ हजार ६०० ग्रामस्थांना २ टँकर, सेलू तालुक्यातील ६ गावांमधील ७ हजार ८३६ ग्रामस्थांना ६ टँकरच्या सहाय्याने आणि जिंतूर तालुक्यातील ८ गावांमधील ९ हजार २७५ ग्रामस्थांना ९ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ पालम तालुक्यात सर्वाधिक १६ टँकर सुरू आहेत़ त्यातील १४ टँकर खाजगी आहेत़ त्या खालोखाल जिंतूर तालुक्यात ९, पूर्णा ८ आणि सेलू तालुक्यात ६ टँकर सुरू आहेत़ एकूण ४४ टॅँकरपैकी ३८ खाजगी टँकर सुरू असून, सहा शासकीय टँकर आहेत़ विशेष म्हणजे मागील वर्षी सुमारे ४२ टँकर्स सुरू केले होते़ यावर्षी ४४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ आगामी काळात टँकरची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़नळयोजनांची दुरुस्तीची कामे४ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने काही भागात नळ योजना दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, त्या माध्यमातूनही ग्रामीण भागाला पाणी टंचाईपासून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उर्वरित रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.अडीच हजार : फेºया मंजूर४टंचाईग्रस्त गावांत सुरू केलेल्या टँकरने एकूण २ हजार ५८९ फेºया कराव्याच्या आहेत़ त्यापैकी प्रत्यक्षात २ हजार ३३४ फेºया आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत़ २५५ फेºया बाकी आहेत़४ पालम तालुक्यात टँकरने ६६५ फेºया पूर्ण केल्या आहेत़ पूर्णा तालुक्यात ५०३, गंगाखेड तालुक्यात १६८, सोनपेठ १०२, सेलू २९४ आणि जिंतूर तालुक्यात ६०२ फेºया पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी देण्यात आले आहे़२१५ विहिरींचे अधिग्रहणटंचाईग्रस्त गावांत टँकर्सबरोबरच अधिग्रहणाच्या सहाय्यानेही पाण्याची सुविधा करण्यात आली आहे़ ज्या गाव परिसरात विहिरीला पाणी उपलब्ध आहे़ ती विहीर अधिग्रहण करून गावाला पाणी दिले जात आहे़प्रशासनाने आतापर्यंत २१५ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ५८ विहिरींचे अधिग्रहण झाले असून, परभणी तालुक्यात ८, पालम ३९, पूर्णा २४, सोनपेठ १५, सेलू १९, पाथरी ४, जिंतूर ३८ आणि मानवत तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़अधिग्रहण केलेल्या विहिरींपैकी ३३ विहिरींचे पाणी टँकरसाठी राखून ठेवले आह़े तर १८२ विहिरींचे पाणी प्रत्यक्ष ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले जात आहे़ त्यामुळे अधिग्रहणाच्या माध्यमातूनही ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे.या गावांमध्ये टँकर सुरू४पालम तालुका- चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामपूर तांडा, पेंडू खु़, सादलापूर, पेंडू बु़, बंदरवाडी, पेठशिवणी, पेठ पिंपळगाव, सातेगाव़४पूर्णा तालुका : पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूऱ४गंगाखेड तालुका : गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी़४सोनपेठ तालुका : नरवाडी, कोथाळा़४सेलू तालुका : तळतुंबा, वालूर, पिंप्री गौंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड़४जिंतूर तालुका : मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, वडी, घागरा, भोसी़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई