शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शंभर टँकरने होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:29 IST

जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच टँकरसाठी निविदा मागवाव्या लागत असल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच टँकरसाठी निविदा मागवाव्या लागत असल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे परिस्थिती अधिकच नाजूक झाली आहे. एकीकडे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले, रबी हंगामात पेरण्या झाल्या नाहीत तर दुसरीकडे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळ्यातील दोन महिने पाऊस नसल्याने भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाई भासत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे आरक्षण केले आहे. या पाणी आरक्षणातून शहरी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईची परिस्थिती गंभीर नसली तरी आगामी काळात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. सोमवारी ही निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.टँकर मालकांकडून १६ नोव्हेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून, १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या निविदांची छाननी केली जाणार असून, २० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठ्यासाठी टँकर लावण्यासंदर्भातील निविदा अंतिम केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी हालचाली केल्या जातात. मात्र यावर्षी परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने आॅक्टोबर महिन्यातच टँकर सुरू करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.जानेवारीपासूनच लागेल टँकर४जिल्ह्यात सध्या प्रकल्पातील पाणीसाठा आणि इतर स्त्रोत व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांपर्यंत हे पाणी पुरेल. मात्र जानेवारी महिन्यात जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. हे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच टँकरचे नियोजन आखले आहे. १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन टँकरसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक टँकर४जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी २०१५-१६ मध्ये २९४ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागला होता. तसेच २०१०-११ मध्ये ६, २०११-१२ मध्ये २३, २०१२-१३ मध्ये ३९, २०१४-१५ मध्ये २४, २०१५-१६ मध्ये २९४, २०१६-१७ मध्ये ३६ आणि २०१७-१८ मध्ये ४६ टँकरने ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी टँकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित४परभणी जिल्ह्यात मागील वर्षीही उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची टंचाई अधिक भासण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यासाठी साधारणत: १ कोटी रुपये प्रशासनाला खर्च करावे लागले. यावर्षी १०० टँकर लावावे लागणार असून, त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे टँकरमुक्त गाव ही संकल्पनाही मागे पडू लागली आहे. परिणामी पाणी टंचाईतही भर पडू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई