शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

परभणी : शंभर टँकरने होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:29 IST

जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच टँकरसाठी निविदा मागवाव्या लागत असल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच टँकरसाठी निविदा मागवाव्या लागत असल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे परिस्थिती अधिकच नाजूक झाली आहे. एकीकडे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले, रबी हंगामात पेरण्या झाल्या नाहीत तर दुसरीकडे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळ्यातील दोन महिने पाऊस नसल्याने भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाई भासत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे आरक्षण केले आहे. या पाणी आरक्षणातून शहरी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईची परिस्थिती गंभीर नसली तरी आगामी काळात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. सोमवारी ही निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.टँकर मालकांकडून १६ नोव्हेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून, १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या निविदांची छाननी केली जाणार असून, २० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठ्यासाठी टँकर लावण्यासंदर्भातील निविदा अंतिम केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी हालचाली केल्या जातात. मात्र यावर्षी परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने आॅक्टोबर महिन्यातच टँकर सुरू करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.जानेवारीपासूनच लागेल टँकर४जिल्ह्यात सध्या प्रकल्पातील पाणीसाठा आणि इतर स्त्रोत व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांपर्यंत हे पाणी पुरेल. मात्र जानेवारी महिन्यात जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. हे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच टँकरचे नियोजन आखले आहे. १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन टँकरसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक टँकर४जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी २०१५-१६ मध्ये २९४ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागला होता. तसेच २०१०-११ मध्ये ६, २०११-१२ मध्ये २३, २०१२-१३ मध्ये ३९, २०१४-१५ मध्ये २४, २०१५-१६ मध्ये २९४, २०१६-१७ मध्ये ३६ आणि २०१७-१८ मध्ये ४६ टँकरने ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी टँकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित४परभणी जिल्ह्यात मागील वर्षीही उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची टंचाई अधिक भासण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यासाठी साधारणत: १ कोटी रुपये प्रशासनाला खर्च करावे लागले. यावर्षी १०० टँकर लावावे लागणार असून, त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे टँकरमुक्त गाव ही संकल्पनाही मागे पडू लागली आहे. परिणामी पाणी टंचाईतही भर पडू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई