शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

परभणी : गोदाकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:04 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरीनदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मूबलक पाणीसाठा होता; परंतु, या पाणीसाठ्यातून नांदेडसाठी २० दलघमी पाणी सोडून देण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातच पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठा हळुहळू कमी होण्यास सुरुवात झाली होती. नांंदेडला पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदीच्या काठावरील गावातील पिण्याच्या पाण्याची अजिबात दखल घेतली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकावे लागणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात पाणीसाठा असूनही जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गोदाकाठच्या गावांना आता पाणीटंचाई भासू लागली आहे. गोदावरीच्या पात्रातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारातील अधिग्रहित पाणीसाठ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. गोदावरी नदीचे पात्र जागोजागी उघडे पडले आहे. यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठीही पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. नांदेड शहराला पिण्यासाठी पाणी लागते तर गोदाकाठच्या गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीwater scarcityपाणी टंचाई