शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

परभणी : गोदाकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:04 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरीनदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मूबलक पाणीसाठा होता; परंतु, या पाणीसाठ्यातून नांदेडसाठी २० दलघमी पाणी सोडून देण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातच पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठा हळुहळू कमी होण्यास सुरुवात झाली होती. नांंदेडला पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदीच्या काठावरील गावातील पिण्याच्या पाण्याची अजिबात दखल घेतली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकावे लागणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात पाणीसाठा असूनही जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गोदाकाठच्या गावांना आता पाणीटंचाई भासू लागली आहे. गोदावरीच्या पात्रातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारातील अधिग्रहित पाणीसाठ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. गोदावरी नदीचे पात्र जागोजागी उघडे पडले आहे. यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठीही पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. नांदेड शहराला पिण्यासाठी पाणी लागते तर गोदाकाठच्या गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीwater scarcityपाणी टंचाई