शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :दहा रुपयांना मिळतोय पाण्याचा हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:03 IST

तालुक्यातील वालूर गावाला टंचाईचा वेढा पडला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी विक्रेत्यांची मात्र चांदी होत आहे. दुष्काळात त्रासलेल्या वालूरकरांना या पाणी विक्रेत्यांकडून १० रुपयांना हंडाभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून विकतच्या पाण्यावर वालूरकरांची भिस्त असल्याने टंचाईबरोबरच आर्थिक झळाही गावकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : तालुक्यातील वालूर गावाला टंचाईचा वेढा पडला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी विक्रेत्यांची मात्र चांदी होत आहे. दुष्काळात त्रासलेल्या वालूरकरांना या पाणी विक्रेत्यांकडून १० रुपयांना हंडाभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून विकतच्या पाण्यावर वालूरकरांची भिस्त असल्याने टंचाईबरोबरच आर्थिक झळाही गावकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत.सेलू तालुक्यात ग्रामीण भागात सहा महिन्यांपासून पाणीटंचाई तीव्र झाली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या दररोज वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईचा ग्राऊंड लेव्हल रिपोर्ट घेण्यासाठी या प्रतिनिधीने टंचाईग्रस्त वालूर गावाला भेट दिली. त्यावेळी टंचाईचे विदारक चित्र दिसून आले.सेलू तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वालूर या गावाची लोकसंख्या १५ ते १७ हजार एवढी आहे. दुष्काळी परिस्थितीने गावातील पाण्याची पातळी खालावली. विंधन विहिरींसह पाणीपुरवठा करणाºया विहिरी, हातपंप कोरडेठाक पडले. त्यामुळे तीन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वास्तविक गावाची लोकसंख्या लक्षात घेता यापूर्वीच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र स्थानिक राजकारणात वालूरकर पाणीटंचाईने होरपळत आहेत. या गावाचा १६ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेश होता. मात्र या योजनेतून थेंबभरही पाणी मिळाले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. एकीकडे पाण्याची टंचाई वाढली असताना दुसरीकडे या टंचाईची संधी साधत विक्रेत्यांनी पाण्याचा बाजार मांडला आहे. सध्या गावात हंडाभर पाण्यासाठी १० रुपये मोजावे लागत आहेत. गावाच्या परिसरात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने दूर अंतरावरुन पाणी आणावे लागते. त्यात महिलांचा अर्धा दिवस पाणी भरण्यासाठी जात आहे.प्रशासनाने सुरुवातीला १२ हजार लिटर टँकरच्या दोन खेपा आणि त्यानंतर काही दिवस चार खेपा करुन पाणीपुरवठा करणाºया विहिरीत सोडले. त्यातच रस्त्याअभावी अनेक दिवस टँकर बंद होते. अजूनही टँकरचे नियोजन सुरळीत झाले नाही. परिणामी काही भागात ८ दिवसांना पाणी सोडले जाते.१०० ते दीडशे लिटर पाणी गावकऱ्यांना मिळते. हेच पाणी आठ दिवस पुरवावे लागत आहे. तर ३०० रुपयांना १ हजार लिटर आणि ३ हजार लिटरच्या टँकरला १२०० रुपये मोजावे लागत आहे. गोरगरीब, कष्टकरी नागरिक पाणी विकत घेऊ शकत नाहीत. जे पैसे उपलब्ध होतील, त्या प्रमाणे विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.दुधना नदी काठावर पाणीपुरवठा करणारी विहीर आणि पंप हाऊस आहे. ही योजना कालबाह्य झाल्याची स्थिती आहे. केवळ दोन तास मोटार चालते. तेच पाणी गावाजवळच्या विहिरीत सोडले जाते. मात्र संपूर्ण गावाची तहान भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गावकºयांना विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.घरकुल : बांधकामांनाही बसतोय फटका४पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका घरकुल बांधकामांना बसला आहे. मोलमजुरी करुन जमवलेल्या पैशांतून लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करावे लागत असल्याचे पाहणीत दिसून आले; परंतु, पाणीटंचाईमुळे या बांधकामांनाही फटका बसला आहे.४काही महिन्यांपूर्वी वाळू टंचाईमुळे घरकुलांचे बांधकाम बंद होते. वाळू खुली झाली तर पाणी मिळत नाही. प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला असला तरी वालूर गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन कमी पडल्याचे दिसत आहे.लोकवर्गणीतून उपसला गाळ४गावातील कानाड गल्लीत सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील एका जुन्या आडातील गाळ उपसण्याचे काम गुरुवारी करण्यात आले.४लोकवर्गणी जमा करुन ग्रामस्थांनी गाळ उपसला आहे. आता या विहिरीतून किमान ५-६ हंडे पाणी मिळेल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.अर्धा दिवस पाणी भरण्यात घालवावा लागतो. विकतचे पाणी घेणे आमच्या सारख्यांना शक्य नाही. त्यामुळे २०-२० रुपये जमा करुन कानाड गल्लीतील विहिरीत असलेला गाळ, केरकचरा काढून घेतला आहे. या विहिरीच्या पाण्यावरच आता आमच्या आशा लागल्या आहेत. सध्या तरी गावात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी हंडा घेऊन फिरावे लागते.- गोदावरी खिरडकरवालूर गावाची लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आवश्यक आहे. सध्या टँकरचे पाणी विहिरीत सोडून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेगवेगळ्या भागात व्हॉल्वच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही, अशा भागासाठी प्रशासनाकडे आणखी एका टँकरची मागणी केली आहे.- संजय साडेगावकर, सरपंचगावात तीन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेद्वारे कधी तरी पाणी येते; परंतु, मुख्य रस्त्यावरील घरापर्यंतच हे पाणी मिळते. आमच्या सारख्यांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे दररोज शेतातून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये दिवसभरातील अर्धावेळ पाण्यासाठी घालवावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करावी.- रमेश जवळकरतीन महिन्यांपासून गावात पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतीने अगोदरच नियोजन करुन उपाययोजना करणे अपेक्षित होते. अधिग्रहण, टँकरसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे लवकर दिली असती तर उपाययोजना करण्यास मदत झाली असती. टँकरच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पाणी मिळावे, यासाठी ग्रा.पं.ला पूर्ण मदत असेल.- राजेंद्र लहाने, जि.प.सदस्य

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ