शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘दुधना’च्या दोन्ही कालव्यात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:29 IST

प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून रब्बीची पिके व जनावरांच्या चाºयासाठी एक पाणीपाळी सोडण्याची मागणी दबावगट व शेतकºयांनी केली होती. सेलू येथे रास्तारोकोही केला होता. त्यानंतर मुंबई येथे पाटबंधारे विभागाच्या बैठकीत कालव्यात २६ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु, जालना जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने नियोजित वेळेत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे संताप व्यक्त करीत सेलू तालुक्यातील शेतकरी व दबावगटाने कालव्यात पाणी सोडण्याबाबत सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.अखेर शुक्रवारी दुपारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर दुपारी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी पाणी सोडताना अ‍ॅड.श्रीकांत वाईकर, अ‍ॅड. तुळशीराम चव्हाण, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, सतीश काकडे, विठ्ठल काळे, प्रकाश चव्हाळ, मुकूंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.८ ते १० दलघमी लागेल पाणीनिम्न दुधना प्रकल्पाचा डावा कालवा ७० कि.मी. तर उजवा कालवा ४० कि.मी. आहे. दोन्ही कालव्याच्या लाभधारक शेतकºयाच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी ८ ते १० दलघमी एवढे पाणी लागणार आहे. यामुळे कालवा लाभक्षेत्रातील हजारो शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार आहे.मुंबईतील बैठकीनंतर सोडले पाणीपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक मुंबई येथे २६ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी पाणी सोडण्यात आले. निम्न दुधनाच्या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तर आ.डॉ.राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतरच या बैठकीचे आयोजन केले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प