शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

परभणी : ‘दुधना’च्या दोन्ही कालव्यात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:29 IST

प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून रब्बीची पिके व जनावरांच्या चाºयासाठी एक पाणीपाळी सोडण्याची मागणी दबावगट व शेतकºयांनी केली होती. सेलू येथे रास्तारोकोही केला होता. त्यानंतर मुंबई येथे पाटबंधारे विभागाच्या बैठकीत कालव्यात २६ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु, जालना जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने नियोजित वेळेत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे संताप व्यक्त करीत सेलू तालुक्यातील शेतकरी व दबावगटाने कालव्यात पाणी सोडण्याबाबत सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.अखेर शुक्रवारी दुपारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर दुपारी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी पाणी सोडताना अ‍ॅड.श्रीकांत वाईकर, अ‍ॅड. तुळशीराम चव्हाण, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, सतीश काकडे, विठ्ठल काळे, प्रकाश चव्हाळ, मुकूंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.८ ते १० दलघमी लागेल पाणीनिम्न दुधना प्रकल्पाचा डावा कालवा ७० कि.मी. तर उजवा कालवा ४० कि.मी. आहे. दोन्ही कालव्याच्या लाभधारक शेतकºयाच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी ८ ते १० दलघमी एवढे पाणी लागणार आहे. यामुळे कालवा लाभक्षेत्रातील हजारो शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार आहे.मुंबईतील बैठकीनंतर सोडले पाणीपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक मुंबई येथे २६ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी पाणी सोडण्यात आले. निम्न दुधनाच्या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तर आ.डॉ.राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतरच या बैठकीचे आयोजन केले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प