शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

परभणी : ‘जायकवाडी’च्या पाण्याने दुष्काळी भागाला तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:00 IST

तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याने दुष्काळी भागाला तारल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याने दुष्काळी भागाला तारल्याचे दिसून येत आहे.पाथरी तालुक्यात यावर्षीच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पुढील दोन महिने पूर्णत: खंड दिला. परिणामी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली. पिकांना चांगला उतारा आला नाही. रबी हंगामातील पिकांची तर पावसाअभावी पेरणीच झाली नाही. दुष्काळी भागात शेतकऱ्यांना शेतातील पिके वाचविण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. जलस्त्रोताचे पाणी कमी झाल्याने बारमाही बागायती पिके घेणारे शेतकरीही अडचणीत सापडले होते.पाथरी तालुक्यात जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा आहे. तर गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे दोन उच्च पातळीचे बंधारे आहेत. या भागात पाऊस कमी पडला असला तरी वरच्या भागात पडलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन पहिल्या दोन महिन्यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना या पाण्याचा लाभ झाला. राज्य शासनाने पंचनामे आणि सर्वेक्षणाच्या आधारे पाथरी तालुका गंभीर दुष्काळाच्या यादीत जाहीर केला. शासनाकडून दुष्काळी भागात जाहीर करण्यात आलेल्या ८ सवलतींमध्ये फारसा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.या तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली जात होती. नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला डाव्या कालव्यात संरक्षित पाणी पाळी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सिंचन होणाºया भागात रबीची पेरणीही झाली.या भागात शेतकºयांनी उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. गत वर्षी लागवड केलेल्या उसालाही पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जायकवाडी धरणाचे पाणी या भागातील शेतकºयांना मिळाले. त्यातच जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरणातून एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे याही पाण्याचा या भागातील शेतकºयांना लाभ झाला आहे. तसेच परिसरातील भूजल पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.४ हजार हेक्टरवरील पिकांना फायदा...दोन महिने पावसाने खंड दिल्यामुळे पाथरी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ परिस्थितीत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या झळा सहन करीत असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून या भागात पाणी सोडल्यामुळे काही अंशी दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. केवळ पाच गावांत बोअर आणि विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर डाव्या काळव्यातील पाण्यामुळे शेती पिकांना लाभ झाला आहे. ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याचबरोबर भूजल पाणी पातळी वाढली आहे. जलस्रोतांना पाणी आल्याने पाणी टंचाईवर मात होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प