शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

परभणी : ‘जायकवाडी’च्या पाण्याने दुष्काळी भागाला तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:00 IST

तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याने दुष्काळी भागाला तारल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याने दुष्काळी भागाला तारल्याचे दिसून येत आहे.पाथरी तालुक्यात यावर्षीच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पुढील दोन महिने पूर्णत: खंड दिला. परिणामी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली. पिकांना चांगला उतारा आला नाही. रबी हंगामातील पिकांची तर पावसाअभावी पेरणीच झाली नाही. दुष्काळी भागात शेतकऱ्यांना शेतातील पिके वाचविण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. जलस्त्रोताचे पाणी कमी झाल्याने बारमाही बागायती पिके घेणारे शेतकरीही अडचणीत सापडले होते.पाथरी तालुक्यात जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा आहे. तर गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे दोन उच्च पातळीचे बंधारे आहेत. या भागात पाऊस कमी पडला असला तरी वरच्या भागात पडलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन पहिल्या दोन महिन्यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना या पाण्याचा लाभ झाला. राज्य शासनाने पंचनामे आणि सर्वेक्षणाच्या आधारे पाथरी तालुका गंभीर दुष्काळाच्या यादीत जाहीर केला. शासनाकडून दुष्काळी भागात जाहीर करण्यात आलेल्या ८ सवलतींमध्ये फारसा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.या तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली जात होती. नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला डाव्या कालव्यात संरक्षित पाणी पाळी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सिंचन होणाºया भागात रबीची पेरणीही झाली.या भागात शेतकºयांनी उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. गत वर्षी लागवड केलेल्या उसालाही पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जायकवाडी धरणाचे पाणी या भागातील शेतकºयांना मिळाले. त्यातच जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरणातून एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे याही पाण्याचा या भागातील शेतकºयांना लाभ झाला आहे. तसेच परिसरातील भूजल पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.४ हजार हेक्टरवरील पिकांना फायदा...दोन महिने पावसाने खंड दिल्यामुळे पाथरी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ परिस्थितीत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या झळा सहन करीत असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून या भागात पाणी सोडल्यामुळे काही अंशी दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. केवळ पाच गावांत बोअर आणि विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर डाव्या काळव्यातील पाण्यामुळे शेती पिकांना लाभ झाला आहे. ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याचबरोबर भूजल पाणी पातळी वाढली आहे. जलस्रोतांना पाणी आल्याने पाणी टंचाईवर मात होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प