शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:36 IST

वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.निम्न दुधना प्रकल्पातून आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. या योजनेचे पंपहाऊस देवला (ता. परतूर जि.जालना) येथे आहे. तर जलशुद्धीकरण केंद्र सेलू तालुक्यातील रवळगाव येथे आहे. पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणचे जवळपास १२ लाख रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने पाच महिन्यापूर्वीच दोन ठिकाणची वीज तोडली.दरवर्षी टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, देऊळगाव, डासाळा, आहेरबोरगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, म्हाळसापूर, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व जलस्त्रोत कोरडे पडले. परिणामी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय गावांना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने आठही गावातील ग्रामपंचायतींनी योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. अनेक गावात चार ते पाच दिवसांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरून दिले जात आहे.केवळ थकित वीज बिलावर महावितरण आडूून बसल्याने दुधनात पाणी असूनही आठ गावे पाण्यासाठी व्याकूळ झाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही थकित वीज बिलावरून योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ंआठ गावातील ग्रामपंचायतींनी निम्मे थकित वीज बिल चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींनी ५० हजार तर मोठ्या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. धनादेश देखील एकत्र केले आहेत. टंचाई लक्षात घेऊन प्रशानसाने थकित वीज बिलाचा दंड आकारू नये. तसेच निम्या रक्कमेवर पाणीपुरवठा योजनेची वीज पूर्ववत करावी-कैलास मोगल, सरपंच कुंडी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीmahavitaranमहावितरण