शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:36 IST

वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.निम्न दुधना प्रकल्पातून आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. या योजनेचे पंपहाऊस देवला (ता. परतूर जि.जालना) येथे आहे. तर जलशुद्धीकरण केंद्र सेलू तालुक्यातील रवळगाव येथे आहे. पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणचे जवळपास १२ लाख रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने पाच महिन्यापूर्वीच दोन ठिकाणची वीज तोडली.दरवर्षी टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, देऊळगाव, डासाळा, आहेरबोरगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, म्हाळसापूर, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व जलस्त्रोत कोरडे पडले. परिणामी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय गावांना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने आठही गावातील ग्रामपंचायतींनी योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. अनेक गावात चार ते पाच दिवसांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरून दिले जात आहे.केवळ थकित वीज बिलावर महावितरण आडूून बसल्याने दुधनात पाणी असूनही आठ गावे पाण्यासाठी व्याकूळ झाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही थकित वीज बिलावरून योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ंआठ गावातील ग्रामपंचायतींनी निम्मे थकित वीज बिल चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींनी ५० हजार तर मोठ्या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. धनादेश देखील एकत्र केले आहेत. टंचाई लक्षात घेऊन प्रशानसाने थकित वीज बिलाचा दंड आकारू नये. तसेच निम्या रक्कमेवर पाणीपुरवठा योजनेची वीज पूर्ववत करावी-कैलास मोगल, सरपंच कुंडी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीmahavitaranमहावितरण