शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

परभणी : खळी पूल परिसरात तीन मीटरपर्यंत आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:47 IST

जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी २५ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले असून मुळी बंधाऱ्यातून सुमारे ४ हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाण्याच्या या विसर्गामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यानचा कच्चा रस्ता वाहून गेला आहे. हे पाणी सरळ डिग्रसच्या दिशेने निघाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी २५ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले असून मुळी बंधाऱ्यातून सुमारे ४ हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाण्याच्या या विसर्गामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यानचा कच्चा रस्ता वाहून गेला आहे. हे पाणी सरळ डिग्रसच्या दिशेने निघाले आहे.तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यानंतर या नदीपात्रात पाणी वाहते झाले नाही. गतवर्षी आॅगस्ट- सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे गंगाखेड ते धारखेड दरम्यान नगर पालिका प्रशासनाने बांधलेला छोटा बंधारा वाहून गेला होता. त्यानंतर या ठिकाणी मातीचा भराव टाकून कच्चा बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयातील पाणी शहरासाठी वापरले जात होते. २४ आॅगस्ट रोजी खडका बंधाºयातून सोडलेले पाणी रात्री १० वाजेच्या सुमारास मुळी बंधाºयातून गंगाखेडच्या दिशेने निघाले. बंधाºयातून ४ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु झाल्याने पात्रातील खड्डे भरल्यानंतर रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमाराह शहराजवळील धारखेड ते गंगाखेड दरम्यान बांधलेल्या मातीच्या बंधाºयात हे पाणी दाखल झाले. मात्र पाण्याच्या वेगामुळे या बंधाºयाला भगदाड पडले असून पाण्याला मोकळी वाट मिळाली आहे. माती बंधाºयावरुन धारखेड, मुळी, नागठाणा या ग्रामस्थांना शहर गाठता येत होते; परंतु, आता मात्र रेल्वे पुलावरुन ३ कि.मी. अंतराचा फेरा घेऊन ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठावे लागत आहे.पूर्णा तालुक्यातील गावांना प्रतीक्षाच४जायकवाडी प्रकल्पातून निघालेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असले तरी पूर्णा तालुक्यातील गावांना अजूनही या पाण्याची प्रतीक्षा आहे. पाथरी, गंगाखेड व पालम तालुक्याचा प्रवास करुन हे पाणी आता पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे असलेल्या डिग्रस बंधाºयात येणार आहे.४पाण्याची गती कमी असल्याने सोमवारपर्यंत बंधाºयात पाणी पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. तर बंधारा भरण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार असून पुढे हे पाणी नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पात सोडतात की नाही, याबाबत शंका आहे. गोदावरीच्या पाण्याची तालुकावासियांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी