शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

परभणी : खळी पूल परिसरात तीन मीटरपर्यंत आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:47 IST

जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी २५ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले असून मुळी बंधाऱ्यातून सुमारे ४ हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाण्याच्या या विसर्गामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यानचा कच्चा रस्ता वाहून गेला आहे. हे पाणी सरळ डिग्रसच्या दिशेने निघाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी २५ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले असून मुळी बंधाऱ्यातून सुमारे ४ हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाण्याच्या या विसर्गामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यानचा कच्चा रस्ता वाहून गेला आहे. हे पाणी सरळ डिग्रसच्या दिशेने निघाले आहे.तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यानंतर या नदीपात्रात पाणी वाहते झाले नाही. गतवर्षी आॅगस्ट- सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे गंगाखेड ते धारखेड दरम्यान नगर पालिका प्रशासनाने बांधलेला छोटा बंधारा वाहून गेला होता. त्यानंतर या ठिकाणी मातीचा भराव टाकून कच्चा बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयातील पाणी शहरासाठी वापरले जात होते. २४ आॅगस्ट रोजी खडका बंधाºयातून सोडलेले पाणी रात्री १० वाजेच्या सुमारास मुळी बंधाºयातून गंगाखेडच्या दिशेने निघाले. बंधाºयातून ४ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु झाल्याने पात्रातील खड्डे भरल्यानंतर रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमाराह शहराजवळील धारखेड ते गंगाखेड दरम्यान बांधलेल्या मातीच्या बंधाºयात हे पाणी दाखल झाले. मात्र पाण्याच्या वेगामुळे या बंधाºयाला भगदाड पडले असून पाण्याला मोकळी वाट मिळाली आहे. माती बंधाºयावरुन धारखेड, मुळी, नागठाणा या ग्रामस्थांना शहर गाठता येत होते; परंतु, आता मात्र रेल्वे पुलावरुन ३ कि.मी. अंतराचा फेरा घेऊन ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठावे लागत आहे.पूर्णा तालुक्यातील गावांना प्रतीक्षाच४जायकवाडी प्रकल्पातून निघालेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असले तरी पूर्णा तालुक्यातील गावांना अजूनही या पाण्याची प्रतीक्षा आहे. पाथरी, गंगाखेड व पालम तालुक्याचा प्रवास करुन हे पाणी आता पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे असलेल्या डिग्रस बंधाºयात येणार आहे.४पाण्याची गती कमी असल्याने सोमवारपर्यंत बंधाºयात पाणी पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. तर बंधारा भरण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार असून पुढे हे पाणी नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पात सोडतात की नाही, याबाबत शंका आहे. गोदावरीच्या पाण्याची तालुकावासियांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी